बांग्लादेश बोर्डाच्या पत्रात काय?
पत्राच्या सुरुवातीला बांगलादेश बोर्डा (BCB)कडून PCB, ICC आणि सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करण्यात आले. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB), अलीकडील आव्हानांवर मात करण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB), आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि सर्व संबंधितांचे मन:पूर्वक आभार मानत आहे.
"या कठीण काळात बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांमुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आमचा हा बंधुभाव असाच बहरत राहो." काल माझ्या पाकिस्तानच्या संक्षिप्त दौऱ्यांनंतर आणि आमच्या चर्चेतून समोर येणाऱ्या सकारात्मक निष्कर्षांचा विचार करता, मी पाकिस्तानला विनंती करतो की, संपूर्ण क्रिकेट जगताच्या फायद्यासाठी त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा ICC T20
वर्ल्डकप सामना खेळावा,असे बांगलादेश बोर्डाचे अध्यक्ष मो. अमिनुल इस्लाम यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानने केलेल्या सर्व मागण्या आयसीसीने फेटळल्यानंतरही आता मोहसीन नक्वी यांना घोषणा करण्याची लाज येते आहे.त्यामुळे अमिनुल इस्लाम यांच्याद्वारे हे पत्रक काढून घोषणेची औपचारीकता करण्यात आली आहे.त्यानंतर कदाचित पाकिस्तान बांगलादेशला विनंती मान देऊन भारताविरूद्ध खेळण्यास तयार येईल,असेच चित्र दिसते. जेणकरून कसं बांगलादेश बोलला म्हणून आम्ही खेळण्यास तयार झालो आमची स्वत:ची काही इच्छा नाही आहे.
