मोहसिन नक्वी यांना राग आला अन्...
सूर्याने आपला हट्ट कायम ठेवला अन् मोहसिन नक्वी ताटकळत उभे राहिले. तब्बल 15 ते 20 मिनिटाच्या वादानंतर मोहसिन नक्वी यांना राग आला अन् मोहसिन नक्वी यानी आशिया कपची ट्रीफी उचलली अन् पळ काढल्याचं पहायला मिळालं. मोहसिन नक्वी यांच्या हातून आम्हाला ट्रॉफी नको, त्यांनी स्टेजवरून खाली उतरावं, अशी मागणी टीम इंडियाने केली होती. त्यानंतर मोहसिन नक्वी यांना राग आला अन् त्यांनी टीम इंडियाला ट्रॉफी दिली नाही.
advertisement
पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं रात्री अडीच वाजता आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय सैन्य दलासाठी मोठी घोषणा केली. पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. या पूर्ण स्पर्धेमधील प्रत्येक सामन्याची माझी मॅचची फी सैन्य दलाला देणार आहे. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमारने सांगितले की, ही फक्त एक ट्रॉफी नाही, ही देशाच्या सन्मानाशी जोडलेली भावना आहे. आपले जवान सीमारेषेवर आपल्यासाठी लढतात, तर आम्ही मैदानावर लढतो. माझ्या दृष्टीने या विजयाचा खरा मान त्यांचाच आहे. सूर्यकुमारच्या या निर्णयाचं कौतुक सोशल मीडियावरुन जगभरातून केलं जातं आहे.