TRENDING:

IND vs BAN : पाकिस्तानची आधी जिरवली,आता बांगलादेशचा वचपा काढला, वर्ल्डकप ड्राम्यासह सगळाच बदला घेतला

Last Updated:

भारताने दिलेल्या 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशचा डाव 88 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे भारताने हा सामना 46 धावांनी जिंकत फायनल जिंकली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India A Women vs Bangladesh A Women : टी20 वर्ल्डकपमध्ये मागच्याच रविवारी भारताने पाकिस्तानचा 61 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने पराभव केला होता.यानंतर आता भारताने बांग्लादेशचा
India A Women vs Bangladesh A Women
India A Women vs Bangladesh A Women
advertisement

फायनलमध्ये पराभव केला आहे.भारताने दिलेल्या 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशचा डाव 88 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे भारताने हा सामना 46 धावांनी जिंकत फायनल जिंकली आहे. या

विजयासह भारताने बांग्लादेशकडून वर्ल्ड कप ड्राम्याचा सगळाच बदला घेतला आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 134 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशची सूरूवात खराब झाली होती. कारण बांग्लादेशची सलामीवीर इश्मा तांजिम 3 वर बाद झाली होती.तिच्यानंतर शकीमा सुलताना आणि सरमीन सुलताना यांनी बांग्लादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण शकीमा 20 तर सरमीन 18 धावावर बाद झाली. तिच्यानंतर सादीआ अक्तर 10 वर आऊट झाली. लोटल मंडर 1,फाहीमा खातून 14,फर्जना इस्मिन 6, संजिदा मेघला 5, फातेमा सोनिया 1 आणि सोफीया खातून 9 धावांवर बाद झाली होती. अशाप्रकारे 19.1 ओव्हरमध्ये बांग्लादेशचा डाव 88 वर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे भारताने 46 धावांनी ही फायनल जिंकली होती.

advertisement

यावेळी भारताकडून प्रेमा रावतने 3 विकेट,सोनिया मेंढीया, तनुजा कानवेर 2 विकेट, साईमा ठोकर,, मिनू मनी आणि राधा यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

खरं तर हा सामना एसीसी रायझिंग स्टार आशिया कपमध्ये खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने बांग्लादेशला फायनलला धुळ चारली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

भारताच्या फलंदाजीबद्दल बोलायच झालं तर तेजल हसबनीसने 51 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. तिच्यासोबत कॅप्टन राधा यादवने 30 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 134 धावा केल्या होत्या. बांग्लादेशकडून कर्णधार फाहीमा खातूनने 4 विकेट घेतल्या होत्या. तिच्यासोबत फातिमा आणि फर्जानाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : पाकिस्तानची आधी जिरवली,आता बांगलादेशचा वचपा काढला, वर्ल्डकप ड्राम्यासह सगळाच बदला घेतला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल