TRENDING:

IPL 2026 : हार्दिक पांड्यानंतर आणखी एक कॅप्टन मॅचमधून बाहेर, संघाला 440 व्होल्टचा झटका

Last Updated:

हार्दिक पांड्यानंतर आणखी एक कॅप्टन मॅचमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीमला मोठा झटका बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
RR vs GT : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने खेळवले गेले. यामध्ये पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट राखून पराभव केला होता. या सामन्यात हार्दिक पांडया खेळत होता,त्याला बरं नव्हतं म्हणून तो मैदानात उतरला नव्हता.त्याच्या जागी सूर्यकु्मार यादवने मुंबई इंडियन्ससाठी कॅप्टन्सी केली होती.त्यानंतर आता हार्दिक पांड्यानंतर आणखी एक कॅप्टन मॅचमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीमला मोठा झटका बसला आहे.
ipl captain
ipl captain
advertisement

आयपीएलमध्ये आज दुसरा सामना हा गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जातोय. या सामन्या दरम्यान गुजरात टायटन्सला मोठा झटका बसला आहे. कारण गुजरात टायसन्सचा कर्णधार शुभमन गिल या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या अनुपस्थितित स्टार लेग-स्पिनर राशीद खान आज संघाचे नेतृत्व करत आहे.

गिलला नेमकं झालं काय?

advertisement

टॉसच्या वेळी बोलताना कर्णधार राशीद खानने शुभमन गिलच्या दुखापतीची माहिती दिली. शुभमन गिलला स्नायूंचा त्रास (Muscle Spasm) जाणवत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला आजच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. "शुभमनला थोडा त्रास होत आहे, आशा आहे की तो लवकरच पुनरागमन करेल," असे राशीदने यावेळी नमूद केले. गिलच्या जागी युवा यष्टीरक्षक फलंदाज कुमार कुशाग्र याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

advertisement

टॉस जिंकल्यानंतर बोलताना राशीद म्हणाला, "आम्हालाही प्रथम बॉलिंगच करायची होती. खेळपट्टी ताजी असून सुरुवातीला बॉलर्सना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या सामन्यात आम्ही चांगली क्रिकेट खेळलो, पण बॉलिंग आणि बॅटिंग अशा दोन्ही आघाड्यांवर सुधारणेला वाव आहे. आज आम्हाला आमचा 'ए-गेम' दाखवून 100 टक्के योगदान द्यावे लागेल."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्हाला वेगवेगळ्या परिस्थितींचे मूल्यांकन करून त्यानुसार जुळवून घ्यावे लागेल. आशा आहे की आम्ही २१० च्या आसपास एक चांगली धावसंख्या उभारू आणि नंतर तिचा बचाव करू. आम्हाला असा संघ बनायचा आहे जो सर्व प्रकारच्या परिस्थितीत खेळू शकेल. मला एक लवचिक संघ हवा आहे. आम्हाला एकाच प्रकारचा क्रिकेट खेळायचा नाही. आम्हाला असा संघ बनायचा नाही जो फक्त २०० किंवा २५० धावा करतो किंवा करतो. मला वाटतं, जसं मी म्हणालो, आम्ही खेळपट्टीचा अंदाज घ्यावा, आयपीएलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या परिस्थितीत खेळावे आणि त्यात पारंगत व्हावे. तर मला वाटतं हाच संदेश आहे. दोन बदल. ब्रिजेशच्या जागी तुषार देशपांडे आणि बिश्नोईच्या जागी शुभम दुबे संघात आले आहेत, असे रियान परागने सांगितले आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : हार्दिक पांड्यानंतर आणखी एक कॅप्टन मॅचमधून बाहेर, संघाला 440 व्होल्टचा झटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल