109 वर 7 विकेट्स
सचिनने प्रेशरमध्ये कसं खेळायचं हे सांगून देखील मुंबईच्या खेळाडूंना बॅक टू बॅक विकेट्स सोडल्या. सलमीवीर यशस्वी जस्वाल चांगली कामगिरी करू शकला नाही तर अखिल हेरवाडकर याने मजबूत पाय रोवून स्कोरबोर्ड चालवला. तर मुशीर खान याला एक धाव करता आली. सिद्देश लाड, सुर्यांश शेंडगे यांच्या फॉर्म्युला चालला नाही. कॅप्टन शार्दुल ठाकूर देखील 16 रन्स करून आऊट झालाय. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी 109 वर 7 विकेट्स अशी परिस्थिती मुंबईची होती. कर्नाटककडून प्रसिद्ध कृष्णाने तीन विकेट्स नावावर केल्या.
advertisement
काय म्हणाला होता शार्दुल ठाकूर?
ड्रेसिंग रूममध्ये सचिन सर असणं हे आमचं भाग्य आहे. ते केवळ प्रेरणादायी संभाषण नव्हतं, तर प्रश्नोत्तरांचे सत्र होते. सर्व खेळाडू आणि संबंधित प्रशिक्षकांनी त्याला विविध प्रश्न विचारले. हे प्रश्न तयारी, विजयी मानसिकता आणि कठीण परिस्थितीत दबाव हाताळण्यापर्यंत होते, असं शार्दुल ठाकूर म्हणाला होता. मात्र, मुंबईच्या खेळाडूंना प्रेशर हँडल करता आलं नाही.
दरम्यान, सचिन सरांचे मार्गदर्शन मुंबई संघासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. खेळातील एका महान खेळाडूकडून शहाणपणाचे काही शब्द ऐकून सर्व मुले आनंदी आहेत, असंही शार्दुल ठाकूर म्हणाला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर, ठाकूर या नॉकआउट सामन्यासाठी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालसह संघात परतला आहे. मात्र, जयस्वालला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाहीये.
