TRENDING:

Mumbai : 3 ओव्हरमध्ये 4 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या बॉलिंगने आग ओकली, रोहितशिवाय मुंबईचा वादळी विजय

Last Updated:

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने छत्तीसगडचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली आहे. मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने नव्या बॉलने धमाका केला, त्यानंतर शम्स मुलानीच्या स्पिनची जादू चालली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने छत्तीसगडचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली आहे. मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने नव्या बॉलने धमाका केला, त्यानंतर शम्स मुलानीच्या स्पिनची जादू चालली, त्यामुळे छत्तीसगडचा 142 रनवर ऑलआऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 156 बॉल शिल्लक असतानाच केला. मुंबईने हा सामना 9 विकेटने जिंकला. याआधीच्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा मुंबईच्या टीममध्ये होता, पण छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात मुंबई रोहित शर्माशिवायच मैदानात उतरली.
3 ओव्हरमध्ये 4 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या बॉलिंगने आग ओकली, रोहितशिवाय मुंबईचा वादळी विजय
3 ओव्हरमध्ये 4 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या बॉलिंगने आग ओकली, रोहितशिवाय मुंबईचा वादळी विजय
advertisement

या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर कर्णधार शार्दुल ठाकूरच्या बॉलने आग ओकली. फास्ट बॉलरना मदत करणाऱ्या या खेळपट्टीचा शार्दुलने पुरेपुर फायदा उचलला. पहिल्याच ओव्हरमध्ये शार्दुलने 2 विकेट घेतल्या, त्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये त्याने आणखी 2 विकेट मिळवल्या, त्यामुळे छत्तीसगडची टॉप ऑर्डर कोसळली. शार्दुलने 3 ओव्हरमध्येच 4 विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे छत्तीसगडचा स्कोअर पहिल्या 5 ओव्हरमध्ये 10 रनवर 4 विकेट असा होता.

advertisement

मुलानीच्या स्पिनसमोर लोटांगण

छत्तीसगडचा कर्णधार अमनदीप खरे (63 रन) आणि अजय मंडल (46 रन) यांनी पाचव्या विकेटसाठी 105 रनची पार्टनरशीप केली. पण त्यानंतर शम्स मुलानीच्या स्पिन बॉलिंगची जादू चालली, त्यामुळे छत्तीसगडचा 38.1 ओव्हरमध्येच 142 रनवर ऑलआऊट झाला. शम्स मुलानीने शेवटच्या 6 पैकी 5 विकेट घेतल्या. मुलानीला त्याच्या 5 विकेट 31 रन देऊन मिळाल्या. छत्तीसगडने त्यांच्या शेवटच्या 6 विकेट फक्त 27 रनमध्येच गमावल्या.

advertisement

अंककृष-सिद्धेशने मिळवून दिला विजय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढला सोयाबीनचा भाव, तूर आणि कापसाची स्थिती काय?
सर्व पहा

या आव्हानाचा पाठलाग करताना अंगकृष रघुवंशी याने 66 बॉलमध्ये नाबाद 68 आणि सिद्धेश लाडने 42 बॉलमध्ये नाबाद 48 रन केले, या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 102 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे मुंबईने फक्त 24 ओव्हरमध्येच 9 विकेटने हा सामना जिंकला. इशान मुलचंदानीच्या रुपात मुंबईने एकमेव विकेट गमावली, जो 19 रनवर हर्ष यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. मुंबई 3 सामन्यांमध्ये 3 विजयांमुळे 12 पॉईंट्ससह ग्रुप सीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai : 3 ओव्हरमध्ये 4 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या बॉलिंगने आग ओकली, रोहितशिवाय मुंबईचा वादळी विजय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल