काय म्हणाला अॅडम मार्करम?
या पीचवर खेळणं सोपं नव्हतं, पण आमच्या खेळाडूंनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये बदल केला आणि प्लॅन्सची यशस्वी अंमलबजावणी केली. बॉलरनी या मॅचमध्ये जबरदस्त पुनरागमन केलं. या स्पर्धेची सुरुवात त्यांच्यासाठी थोडी कठीण झाली होती, पण आज ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली ती खरोखरच कौतुकास्पद आहे. टीममधील प्रत्येक बॉलरने आपल्या रोलनुसार अचूक टप्प्यावर बॉल टाकत भारतीय बॅट्समनना रोखून धरलं, ज्यामुळे हा विजय साऊथ अफ्रिकेच्या पारड्यात पडला असं मार्करम याने म्हटलं आहे.
advertisement
मॅचचा टर्निंग पाईंट
डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस या दोघांनी टीमची इनिंग सावरली आणि आम्हाला मॅचमध्ये टिकवून ठेवलं. पीच थोडं संथ होतं, त्यामुळे आम्ही आमचा अहंकार बाजूला ठेवून केवळ धावण्यावर आणि गॅप शोधण्यावर भर दिला. मधल्या ओव्हरमध्ये केलेली बॅटिंगच या मॅचमध्ये महत्त्वाचा फरक ठरली, असं म्हणत त्याने मॅचचा टर्निंग पाईंट सांगितला.
टॉप ऑर्डरवर पराभवाचं खापर फोडलं
फिल्डिंगमध्ये काही चुका झाल्या असल्या तरी टीममधील खेळाडू एकमेकांशी चांगले कनेक्टेड होते. एनगिडी हा टीमसाठी महत्त्वाचा विकेट टेकर असून परिस्थितीनुसार त्याचा वापर केला जातो. टीम इंडियाची बॅटिंग साईड त्यांना खेळी शकली नाही, असं म्हणत त्याने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
सेमीफायनलचा रस्ता अवघड
दरम्यान, साऊथ अफ्रिकेच्या विजयानंतर आता टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट अधिक किचकट झालं आहे. टीम इंडियाला आता उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मार्जिनने जिंकावेच लागणार आहे. त्यामुळे झिम्बॉब्वे आणि वेस्ट इंडिज यांना मोठ्या दमाने खेळावं देखील लागेल.
