पॉवरप्लेमध्येच मॅच जिंकता येत नाही
बॅटिंगबद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, 180 पेक्षा जास्त रन्सचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्येच मॅच जिंकता येत नाही, पण तिथं ती नक्कीच गमावली जाऊ शकते. आम्ही पॉवरप्लेमध्येच खूप जास्त विकेट्स गमावल्या, ज्यामुळे आमचा पाया डळमळीत झाला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या पार्टनरशिप्सची गरज होती, त्या आम्हाला मैदानावर रचता आल्या नाहीत.
advertisement
बुमराह अन् अर्शदीपचं कौतुक
जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या बॉलिंग जोडीचे सूर्याने भरभरून कौतुक केले. या दोघांचे कॉम्बिनेशन अत्यं अचूक असून त्यांनी मिळून 8 ओव्हरमध्ये साधारण 5 विकेट्स घेतल्या. हे दोन्ही अनुभवी बॉलर टीमसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांनी आज पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. त्यांच्यातील हीच भागीदारी आम्हाला पुढच्या मॅचमध्येही अपेक्षित असल्याचे कॅप्टनने नमूद केले.
कोणताही मोठा बदल नाही
झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी मॅचबद्दल विचारले असता, सूर्याने सांगितले की प्लॅन्समध्ये कोणताही मोठा बदल केला जाणार नाही. आम्ही आमचा आक्रमक क्रिकेटचा ब्रँड कायम ठेवणार आहोत. चांगली बॅटिंग, सधी बॉलिंग आणि चुस्त फिल्डिंग या तीन गोष्टींवरच आमचा भर असेल. प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी माहित असून, आम्ही पुन्हा एकदा जोमाने कमबॅक करू, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
चुकांची समीक्षा करू
दरम्यान, शेवटी सूर्याने स्पष्ट केले की, हा पराभव म्हणजे आमच्यासाठी शिकण्याची एक संधी आहे. आम्ही शांतपणे बसून झालेल्या चुकांची समीक्षा करू आणि अधिक ताकदीने मैदानात उतरू. सेमीफायनल गाठण्यासाठी टीम आता पूर्णपणे सज्ज असून, आगामी मॅचमध्ये मैदानावरील आमचा खेळ प्रभावी दिसेल. या विजयासाठी खेळाडूंना आता केवळ बेसिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असंही सूर्या म्हणाला.
