काय म्हणाला कॅप्टन सूर्या?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतीय खेळाडूंचे कान टोचले आहेत. 'सुरूवातीला आम्ही मॅचमध्ये होतो. सुरूवातीला आम्ही चांगली बॉलिंग केली. 21 रनवर त्यांच्या 3 विकेट गेल्या होत्या. 7 ते 15 ओव्हरमध्ये त्यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली, त्यानंतर आम्ही पुन्हा पुनरागमन केलं, पण आम्ही चांगली बॅटिंग करू शकलो असतो', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
बॅटिंगवर फोडलं खापर
'कधी कधी तुम्ही विचार केला पाहिजे, 180-185 रनचा पाठलाग करताना तुम्ही पॉवर प्ले मध्ये मॅच जिंकू शकत नाही, पण तुम्ही पॉवर प्ले मध्ये सामना हरू शकता. पॉवर प्लेमध्ये आम्ही बऱ्याच विकेट गमावल्या. त्यानंतर आम्ही छोट्या छोट्या पार्टनरशीपही करू शकलो नाही. 180-185 रनचा पाठलाग करताना छोट्या छोट्या पार्टनरशीपची गरज असते, पण हा खेळाचा भाग आहे. आम्ही यातून शिकू आणि जोरदार कमबॅक करू. झिम्बाब्वेविरुद्ध आम्ही बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग चांगली करू. आम्ही गोष्टी सोप्या ठेवू आणि त्याच ब्रँडचं क्रिकेट खेळू', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली आहे.
