TRENDING:

IND vs ENG : वैभव-आयुशसह सगळ्यांनीच चोपून काढलं, इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला,पण टीम इंडियाकडून शेवटच्या क्षणी मोठी चूक

Last Updated:

खरं तर ज्या वेगाने पहिल्या ओव्हरपासून टीम इंडिया खेळत होती ते पाहता जवळपास 500 च्या आसपास टीम इंडिया पोहोचू शकली असती. पण शेवटच्या क्षणी टीम इंडियाकडून काही चूका घडल्यामुळे टीम इंडियाची धावगती थोडी कमी झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India U19 vs England U19 : झिम्बाबेच्या हरारे स्पोर्टस क्लबमध्ये सूरू असलेल्या वर्ल्ड कप फायनल सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या 175 धावांच्या दीड शतकीय आणि कर्णधार आयुश म्हात्रेच्या 53 धावांच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर भारताने 411 धावा ठोकल्या आहेत. खरं तर ज्या वेगाने पहिल्या ओव्हरपासून टीम इंडिया खेळत होती ते पाहता जवळपास 500 च्या आसपास टीम इंडिया पोहोचू शकली असती. पण शेवटच्या क्षणी टीम इंडियाकडून काही चूका घडल्यामुळे टीम इंडियाची धावगती थोडी कमी झाली.
vaibhav suryavanshi ayush mhatre
vaibhav suryavanshi ayush mhatre
advertisement

टीम इंडियाचा कर्णधार आयुश म्हात्रे टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज मैदानात आले होते.दोघेही डावाची चांगली सूरूवात करतील,अशी अपेक्षा होती.पण ऑरोन जॉर्न 9 वर बाद झाला.त्यानंतर कर्णधार आयुश म्हात्रे मैदानात आला होता.यावेळी दोघांनी टीचून फलंदाजी करत धावगती वाढवली होती.या दरम्यान वैभव सूर्यवंशी आणि आयुश म्हात्रेमध्ये 142 धावांची पार्टनरशीप झाली होता. त्यानंतर आयुश 53 धावा करून बाद झाला.

advertisement

आयुश बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने 55 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले होते. या शतकानंतर वैभव थांबल नाही त्याने वादळी खेळी सूरूच ठेवली. अशाप्रकारे जवळपास त्याने 80 बॉलमध्ये 175 धावांचा दीड शतकीय खेळी केली होती.या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले होते.

वैभव ज्यावेळेस आऊट झाला त्यावेळेस 26 वी ओव्हर सूरू होती आणि भारताच्या धावा 250 च्या पार गेल्या होत्या. आता उरलेल्या 25 ओव्हरमध्ये टीम इंडिया हमखास 500 धावा करता आल्या असत्या. पण झालं असं की वैभव बाद झाल्यानंतर कोणत्याही खेळाडूने 25 ओव्हर टीकून खेळण्याचा विचार केला नाही, याउलट ते वेगाने खेळत बाद झाले. भारताच्या धावा जवळपास चांगल्या स्थितीत होत्या इथून पुढे जास्तीत जास्त खेळाडूंनी टीकून खेळले असते तरध धावा 500 पर्यंत गेल्या होत्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

भारताचा रनरेटही चांगला होता पण खेळाडू मैदानात टीकत नव्हते, जसे वेदांत त्रिवेदी 32, विहान मल्होत्रा 30 वर बाद झाले. अभिग्यान कुंडूकडून मोठया धावांची अपेक्षा होती, पण तो 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर असे वाटत होते भारताचा डाव हा 400च्या आतच ऑल आऊट होईल पण कनिश्क चौहान ताबडतोड 37 धावांची खेळी करून भारताला 400 च्या पार नेले होते.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : वैभव-आयुशसह सगळ्यांनीच चोपून काढलं, इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला,पण टीम इंडियाकडून शेवटच्या क्षणी मोठी चूक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल