आपल्या पुराणात असं म्हटलं आहे की भगवान श्रीकृष्णाने आपल्या शरीराच्या डाव्या भागातून गायीची निर्मिती केली. तिचं नाव सुरभी होतं आणि तिच्या प्रत्येक छिद्रातून करोडो गायी आणि वासरे जन्माला आली. गुरु वशिष्ठांनी गाय कुटुंबाचा विस्तार केला आणि नवीन प्रजाती विकसित केल्या. हिंदू धर्मग्रंथानुसार गायींमध्ये 33 कोटी देवी-देवता वास करतात. हे झालं उत्पत्तीबाबत. पण काही ऐतिहासिक दावे केले गेले आहेत, ज्यात सांगितलं गेलं आहे की गाय पहिल्यांदा कुठे पाळली गेली होती? त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
advertisement
Knowledge - असा शब्द जो लग्न न झालेली तरुणी कुणासमोरच बोलू शकत नाही
treehugger.com च्या अहवालानुसार, गाय प्रथम दक्षिण-पूर्व तुर्कीमध्ये पाळण्यात आली होती. हे ऑरोच नावाच्या जंगली बैलांचं अपत्य होतं, ज्यांना टॉरिन गायी म्हणून ओळखलं जात असे. यानंतर, सुमारे 7,000 वर्षांपूर्वी भारतात गायींचे पालन-पोषण झाल्याचे पुरावे आहेत. ही गायीची आणखी एक प्रजाती होती, जी झेबू म्हणून ओळखली जाते. संशोधनातून असं दिसून आलं की जंगली ऑरोच 1627 मध्ये जास्त शिकार आणि जागेच्या अभावामुळे नामशेष झाले. मात्र, पाण्यातील म्हशी, जंगली याक आणि पाळीव गायी हे त्यांचे वंशज मानले जातात.
2009 मध्ये, जेव्हा शास्त्रज्ञांनी गायींच्या जीनोमचे मॅपिंग केलं तेव्हा असं आढळून आलं की गुरांमध्ये सुमारे 22,000 जीन्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे ते त्यांचे 80 टक्के जनुक मानवांसोबत शेअर करतात. म्हणजेच ही जनुके मानवामध्येही असतात. गायी प्राचीन काळापासून संपत्ती दर्शवतात. तुम्ही गुरेढोरे हा शब्द ऐकला असेल, पण तो आला कुठून? तर, "गुरे" हा शब्द जुन्या फ्रेंच "चॅटेल" वरून आला आहे. याचा अर्थ मालमत्ता. जगाच्या अनेक भागांमध्ये गुरेढोरे हे आर्थिक समृद्धीचे सूचक मानले जातात.
