advertisement

आधी विश्वास जिंकला, मग माय-लेकाचं धक्कादायक कांड, 16 जण फसले, छ. संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: सुरुवातीला लोकांचा विश्वास जिंकला आणि पुन्हा आरोपी माय-लेकाने कोणालाही सोडले नाही.

आधी विश्वास जिंकला, मग माय-लेकांचं मोठं कांड, 16 जण फसले, छ. संभाजीनगरात खळबळ
आधी विश्वास जिंकला, मग माय-लेकांचं मोठं कांड, 16 जण फसले, छ. संभाजीनगरात खळबळ
छत्रपती संभाजीनगर : भिशीच्या माध्यमातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 16 जणांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. या 16 जणांची माय-लेकाने सुमारे 2 कोटी 99 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. नंदाबाई रमेश आधुडे (45) आणि तिचा मुलगा सौरभ रमेश आधुडे (21 दोघेही रा. बीड बायपास, मूळ जालना घनसावंगी) अशी या आरोपींची नावे असून, या दोघांना न्यायालयाने 3 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड बायपास परिसरातील व्यंकटेश पार्क येथे राहणारी नंदाबाई रमेश आधुडे ही 2018 पासून भिशी चालवत होती. सुरुवातीला लहान भिश्यांचे व्यवहार वेळेवर पूर्ण करून त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला, मात्र नोव्हेंबर 2022 पासून मोठ्या रकमांच्या भिश्या सुरू करून त्यांनी गुंतवणुकीचा ओघ स्वतःकडे वळवला.
advertisement
जयश्री गिरी यांनी या भिशीत 20 महिने दरमहा 50 हजार रुपये, याप्रमाणे दहा लाख भरले. यापूर्वीचे दहा लाख आणि हे दहा लाख असे एकूण त्यांचे 20 लाख रुपये नंदाबाईकडे जमा होते. या माय-लेकाने लोकांचा विश्वास संपादन करून एकूण 2 कोटी 99 लाख 20 हजार रुपये घेतले. परंतु मुदत संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि विविध प्रकारची कारणे सांगितले. फसवणूक झाल्याचे समजताच गिरी यांच्यासह इतर नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले.
advertisement
भिशीच्या नावाखाली या लोकांची फसवणूक 
या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती मोठी असून आरोपी माय-लेकाने कोणालाही सोडले नाही. यामध्ये सपना मरकड 50 लाख, मीरा फलके 50 लाख, तर विलास माने 30 लाख, कमलबाई सुरसे 21.50 लाख आणि जयश्री गिरी 20 लाख, यांचीही मोठी रक्कम बुडाली आहे. याशिवाय सावित्री आघाव 19 लाख 80 हजार, नंदा बेंद्रे 15 लाख 50 हजार, रंजना आघाव 16 लाख 20 हजार, गुलाब राठोड 15 लाख 50 हजार, तर राम घायाळ यांची 4 लाख रुपयांची फसवणूक केली. अशा एकूण 16 लोकांनी 2 कोटी 99 लाख 20 हजार 500 रोख नंदाबाई व सौरभ कडे जमा केले होते.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
आधी विश्वास जिंकला, मग माय-लेकाचं धक्कादायक कांड, 16 जण फसले, छ. संभाजीनगरात खळबळ
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement