'जागा वाटपामुळे सर्वच...'; वर्षा गायकवाड यांच्या दिल्लीवारीवर पटोले स्पष्टच बोलले
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
लोकसभा निवडणुकसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं आहे, मात्र अजूनही काही जागांचा तिढा सुटला नसल्याचं चित्र आहे.
नागपूर, उदय तिमांडे, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. जागा वाटप देखील झालं आहे. मात्र अजूनही काही जागांचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. मात्र या जागेवरचा दावा अजूनही काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने सोडला नसल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील हे आता सांगलीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड या देखील नाराज आहेत, काँग्रेमध्ये सुरू असलेल्या या सर्व नाराजी नाट्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले यांनी विशाल पाटील यांच्याबाबत बोलनं टाळलं आहे. विशाल पाटील यांच्याबद्दल आमच्याकडे माहिती नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी म्हटलं की, हे खरं आहे की जागा वाटपामुळे सर्वच समाधानी नाही, ज्या जागा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही, वर्षाताई आपले म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीला गेल्या, होत्या त्यात काही वावगं नाही.
advertisement
दरम्यान आज सलमान खान याच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली, यावर देखील पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. अनेक घटना घडत आहेत, आता सलमानच्या घरासमोर गोळीबार झाला, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
April 14, 2024 2:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
'जागा वाटपामुळे सर्वच...'; वर्षा गायकवाड यांच्या दिल्लीवारीवर पटोले स्पष्टच बोलले


