Shivshahi Bus : एसटीचा स्वस्तातील गारेगार प्रवास बंद होणार, राज्य सरकारचा शिवशाही बसबाबत मोठा निर्णय;नेमकं कारण काय?
Last Updated:
Shivshahi Bus Update : शिवशाही बसबाबत एक मोठा निर्णय समोर आलेला आहे. ज्यात नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे शिवाय प्रवाशांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो का प्रवास अधिक सुखकर होणार ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही गावी जाण्यासाठी शिवशाही बसचा पर्याय निवड असाल तर आता तो तुम्हाला या पुढे निवडता येणार नाही. नेमकं काय कारण आहे ते जाणून घ्या.
राज्य शासनाचा मोठा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्गवहन महामंडळाने शिवशाही बसांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्यात शिवशाही एसी बस बंद होण्याची शक्यता आहे. मात्र यामागे सतत होणारे तांत्रिक बिघाड आणि प्रवाशांकडून कमी होत असलेला प्रतिसाद लक्षात घेता हो निर्णय घेण्यात येणार आहे पण हे अजून ठरलेले नाही.
शिवशाही बस बंद होणार?
महामंडळाच्या मालकीच्या 453 शिवशाही बसांचे निमआराम आणि साध्या बसांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे एसी सुविधांसाठी ओळखली जाणारी शिवशाही आता साध्या स्वरूपात रस्त्यावर धावताना दिसणार आहे.
advertisement
एसटीच्या ताफ्यात सध्या एकूण 688 स्वमालकीच्या शिवशाही बस आहेत. त्यापैकी 453 बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र या बसांचे आयुष्य 10 वर्षांपेक्षा जास्त नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, विशेषतहा वातानुकूलित यंत्रणेतील अडचणी तसेच देखभालीचा वाढता खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही महिन्यांत अनेक प्रवाशांनी बस उशिरा पोहोचणे, एसी बंद पडणे, आणि प्रवासात होणाऱ्या गैरसोयीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे प्रवासी हळूहळू इतर पर्यायांकडे वळू लागले होते. या पार्श्वभूमीवर खर्च कमी करणे आणि सेवा सुरळीत ठेवणे या उद्देशाने शिवशाही बसांचे रूपांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 1:34 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shivshahi Bus : एसटीचा स्वस्तातील गारेगार प्रवास बंद होणार, राज्य सरकारचा शिवशाही बसबाबत मोठा निर्णय;नेमकं कारण काय?







