advertisement

Success Story : नेहमीच्या पिकांत मिळतं नव्हतं उत्पन्न, राजेश यांनी केला टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग, लाखात कमाई

Last Updated:
तरुण शेतकरी राजेश नवनाथ राठोड यांनी शेतीमध्ये असाच एक प्रयोग केला आहे. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत टरबूज शेती केली आहे.
1/7
शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरीही मागे नाहीत.
शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरीही मागे नाहीत.
advertisement
2/7
बीडमधील तरुण शेतकरी राजेश नवनाथ राठोड यांनी शेतीमध्ये असाच एक प्रयोग केला आहे. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत टरबूज शेती केली आहे. यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळाले आहे.
बीडमधील तरुण शेतकरी राजेश नवनाथ राठोड यांनी शेतीमध्ये असाच एक प्रयोग केला आहे. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत टरबूज शेती केली आहे. यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
3/7
राजेश नवनाथ राठोड यांना तीन एकर शेती आहे. त्यांनी शेतीमध्ये दरवर्षीप्रमाणे कापूस पिकाची लागवड केली होती, मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते चिंतेत होते. वाढता खर्च, अनिश्चित हवामान आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे कापसातून समाधानकारक नफा मिळत नव्हता.
राजेश नवनाथ राठोड यांना तीन एकर शेती आहे. त्यांनी शेतीमध्ये दरवर्षीप्रमाणे कापूस पिकाची लागवड केली होती, मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते चिंतेत होते. वाढता खर्च, अनिश्चित हवामान आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे कापसातून समाधानकारक नफा मिळत नव्हता.
advertisement
4/7
त्यामुळे त्यांनी शेतामध्ये नवीन काहीतरी करण्याचे ठरवले आणि तीन एकरातील कापूस पूर्णपणे उपटून टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. त्याचा हा टरबूज शेतीचा पहिलाच प्रयोग होता.
त्यामुळे त्यांनी शेतामध्ये नवीन काहीतरी करण्याचे ठरवले आणि तीन एकरातील कापूस पूर्णपणे उपटून टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. त्याचा हा टरबूज शेतीचा पहिलाच प्रयोग होता.
advertisement
5/7
राजेश राठोड यांनी आधुनिक पद्धतीने टरबूज लागवड केली. योग्य बियाण्यांची निवड, ठिबक सिंचनाचा वापर आणि वेळेवर खत व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
राजेश राठोड यांनी आधुनिक पद्धतीने टरबूज लागवड केली. योग्य बियाण्यांची निवड, ठिबक सिंचनाचा वापर आणि वेळेवर खत व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
advertisement
6/7
मेहनतीसोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी माल थेट व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या नियोजनबद्ध शेतीचा परिणाम पहिल्याच हंगामात दिसून आला.
मेहनतीसोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी माल थेट व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या नियोजनबद्ध शेतीचा परिणाम पहिल्याच हंगामात दिसून आला.
advertisement
7/7
65 दिवसांत त्यांचे पीक काढणीला आले. पहिल्याच तोडीत त्यांना 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून यामध्ये खर्च वजा जाता 2 लाख रुपये शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अजून एक ते दोन तोडे निघण्याची शक्यता असून अंतिम उत्पन्नात आणखी वाढ होईल, असा त्यांचा अंदाज आहे.
65 दिवसांत त्यांचे पीक काढणीला आले. पहिल्याच तोडीत त्यांना 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून यामध्ये खर्च वजा जाता 2 लाख रुपये शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अजून एक ते दोन तोडे निघण्याची शक्यता असून अंतिम उत्पन्नात आणखी वाढ होईल, असा त्यांचा अंदाज आहे.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement