advertisement

Weather Alert: पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यातील इतर भागांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विभागानुसार हवामान कसे जाणून घेऊया.
1/7
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घातलं आहे. 6 एप्रिल रोजीही राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विभागानुसार हवामान कसे जाणून घेऊया.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घातलं आहे. 6 एप्रिल रोजीही राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विभागानुसार हवामान कसे जाणून घेऊया.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरला पावसाचा कोणताही इशारा नसून हवामान कोरडे राहील. किनारी भागात आर्द्रता अधिक राहू शकते. येथे किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरला पावसाचा कोणताही इशारा नसून हवामान कोरडे राहील. किनारी भागात आर्द्रता अधिक राहू शकते. येथे किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हवामान कोरडे राहणार असले तरी सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या विभागात किमान तापमान सुमारे 22 ते 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हवामान कोरडे राहणार असले तरी सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या विभागात किमान तापमान सुमारे 22 ते 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस राहू शकते, त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस राहू शकते, त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी आणि धाराशिवमध्ये सर्वसाधारणपणे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे या भागात हवामानात अचानक बदल होऊ शकतो.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी आणि धाराशिवमध्ये सर्वसाधारणपणे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे या भागात हवामानात अचानक बदल होऊ शकतो.
advertisement
6/7
संपूर्ण विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावतीसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.
संपूर्ण विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावतीसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.
advertisement
7/7
एकूणच, महाराष्ट्रातील विदर्भाला यलो अलर्टमुळे सतर्कता आवश्यक असून इतर भागांमध्ये कोरडे हवामान राहणार आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये तुरळक वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच, महाराष्ट्रातील विदर्भाला यलो अलर्टमुळे सतर्कता आवश्यक असून इतर भागांमध्ये कोरडे हवामान राहणार आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये तुरळक वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement