मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या चार नगरसेवकांची गरज होती. पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे.यानंतर आता ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे गट भाजपला जोरदार विरोध करत असला तर चंद्रपुरात दोन्ही पक्ष एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षाला सव्वा सव्वा वर्षे महापौर पद मिळणार असल्याची माहिती आहे.परिणामी सर्वाधिक जागा जिंकलेला काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडला आहे.



