जालना शहरापासून 20 किमी अंतरावर असलेल्या मखारी या गावांमध्ये गणेश खैरे यांची शेती आहे. मागील 7 वर्षांपासून ते कंटुल्याची शेती करतात. चिखली दाभाडी येथून त्यांनी 5 हजार रुपये प्रति किलो या दराने पहिल्यांदा बियाणे विकत आणले. आपल्या 10 गुंठे शेतामध्ये त्याची लागवड केली. कंटुले विक्रीतून 50 हजार तर बीज विक्रीतून 50 हजार असा तब्बल 1 लाखांचा नफा त्यांना पहिल्याच वर्षी झाला.
advertisement
Green Chilli Prices: हिरवी मिरची महागली, शेतकऱ्यांसाठी आले चांगले दिवस, किलोला मिळतोय एवढा दर, Video
पुढे त्यांनी हे क्षेत्र अर्ध्या एकर पर्यंत वाढवले. आता त्यांना दरवर्षी दीड ते 2 लाखांचा नफा कंटुले विक्रीतून तर 1 ते सव्वा लाखाचे उत्पन्न त्याच्या बीज विक्रीतून होत आहे. एक शेतकरी 5 हजार रुपये प्रति किलो या दराने कंटुल्याचे बी शेतात लावण्यासाठी या शेतकऱ्याकडून घेऊन जात आहेत.
तर बाजारामध्ये या भाजीला तीनशे ते चारशे रुपये प्रति किलो एवढा प्रचंड दर मिळत आहे. चिकन पेक्षा ही महाग विक्री होत असल्याने आणि पोषक तत्त्वांनी भरपूर असल्याने शेतकरी कंटुलेची शेती केल्याने आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकतात, अशी भावना शेतकरी गणेश खैरे यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.
पारंपारिक पिकांना फाटा देऊन शेतकऱ्यांनी नवनवीन पद्धतीची शेती करावी आणि आपली भरभराट करावी, असं आवाहन देखील नवीन तरुणांना त्यांनी केले आहे.





