TRENDING:

Infosys मध्ये नोकरीची संधी हुकली! नवऱ्याच्या साथीने घेतला हा धाडसी निर्णय, कविता आता करताय ४० लाखांची कमाई

Last Updated:

Farmer Success Story : आयुष्यात संधी दारात येऊनही परिस्थितीमुळे ती गमवावी लागली, तर अनेक जण निराश होतात. मात्र काही जिद्दी माणसं अपयशालाच यशाची पहिली पायरी मानतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयुष्यात संधी दारात येऊनही परिस्थितीमुळे ती गमवावी लागली, तर अनेक जण निराश होतात. मात्र काही जिद्दी माणसं अपयशालाच यशाची पहिली पायरी मानतात. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची कथा म्हणजे कर्नाटकातील कविता मिश्रा. सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण शेतीत उतरून तिने स्वतःचं वेगळं यशविश्व उभं केलं. आज ती एक यशस्वी महिला शेतकरी असून दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे.
Farmer Success Story
Farmer Success Story
advertisement

नोकरीची संधी, पण परंपरांचा अडसर

मूळ कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कविता मिश्रा यांचं लग्न १९९६ मध्ये झालं. त्या मध्यमवर्गीय आणि रूढीवादी कुटुंबातून येतात. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून संगणक शास्त्रात डिप्लोमा पूर्ण केला. शिक्षणानंतर त्यांना थेट Infosys कडून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीची ऑफर मिळाली. मात्र घरातील परंपरा आणि सामाजिक बंधनांमुळे घराबाहेर नोकरी करण्याची परवानगी मिळाली नाही. सासरच्या दबावामुळे अखेर त्यांना ही सुवर्णसंधी नाकारावी लागली.

advertisement

नापीक जमिनीशी संघर्ष

नोकरी गेली तरी कविता थांबल्या नाही. पतीच्या पाठिंब्याने त्यांनी रायचूर जिल्ह्यातील कवितातल येथील वडिलोपार्जित जमीन विकसित करण्याचा निर्णय घेतला. ही जमीन पूर्णपणे खडकाळ, डोंगराळ आणि नापीक होती. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. दीर्घ प्रयत्नांनंतर २००६ मध्ये तिने डाळिंबाची लागवड सुरू केली. काही वर्षे चांगलं उत्पन्न मिळालं, मात्र २०११-१२ मध्ये बॅक्टेरियल ब्लाइट या रोगामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. आठ-दहा वर्षांच्या मेहनतीनंतर पुन्हा एकदा तिच्या हातात नापीक जमीन उरली.

advertisement

अपयशातून नवा मार्ग

या टप्प्यावर अनेक जणांनी हार मानले असते, पण कविताने तसं केलं नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी एकात्मिक शेतीचा मार्ग स्वीकारला. यातूनच “कविता मिश्रा सँडलवुड फार्म” या संकल्पनेचा जन्म झाला. रायचूर जिल्ह्यातील या फार्ममध्ये पांढऱ्या चंदनाची लागवड मुख्य आहे. त्यासोबतच आंबा, पेरू, सीताफळ, आवळा, नारळ, केळी, शेवगा, लिंबू, सपोटा, कढीपत्ता, हळद, मिरपूड, कॉफी, चमेली अशा विविध पिकांची लागवड केली जाते. साग आणि लाल चंदनामुळे हे फार्म कृषी वनीकरणाचं उत्तम उदाहरण ठरलं आहे.

advertisement

आज ४० लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न

कविताने शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली. पांढऱ्या आणि लाल चंदनाच्या विक्रीसाठी तिने Karnataka Soaps and Detergents Limited सोबत अधिकृत करार केला. चोरीचा धोका लक्षात घेऊन शेतात मायक्रोचिप-आधारित ई-सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल थेट पोलिसांपर्यंत पोहोचते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

आज कविता मिश्रा आपल्या फार्ममधून दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचं स्वप्न जरी अपूर्ण राहिलं, तरी मेहनत, चिकाटी आणि नव्या विचारांमुळे तिने शेतीतून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Infosys मध्ये नोकरीची संधी हुकली! नवऱ्याच्या साथीने घेतला हा धाडसी निर्णय, कविता आता करताय ४० लाखांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल