TRENDING:

शेतकऱ्यांना बाप्पा पावला!अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात, आता मदत कधी मिळणार?

Last Updated:

बाधित भागातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Agriculture News : मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यासह इतक पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बाधित भागातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Dattatray bharne
Dattatray bharne
advertisement

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

advertisement

सर्वाधिक बाधित जिल्हे:

नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर

वाशीम – १,६४,५५७ हेक्टर

यवतमाळ – १,६४,९३२ हेक्टर

धाराशिव - १५०,७५३

बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर

अकोला – ४३,८२८ हेक्टर

सोलापूर – ४७,२६६ हेक्टर

हिंगोली – ४०,००० हेक्टर

बाधित पिके:

सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

advertisement

एकूण बाधित जिल्हे:

नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.

मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांना बाप्पा पावला!अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात, आता मदत कधी मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल