भोकरदन तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मिरचीवर कोकडासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांना औषधी फवारणी करावी लागली आहे. आता आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतली आहेत. एवढेच नव्हे, तर मिरची उत्पादक शेतकरीदेखील मिरचीचा तोडा तोडून बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. सध्या बाजारात आवक कमी असल्यामुळे भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहेत. महिनाभरात आवक वाढणार असल्याने भावातही घट होणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
advertisement
अल्पभूधारक शेतकऱ्यानं डोकं चालवलं, अर्ध्या एकरात लावली पैशाची बाग, आता लाखात कमाई!
सध्या बाजारपेठेत आवक कमी आहे. परिणामी, भाव कमी अधिक आहेत, परंतु आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन अधिक झाल्यास आपोआप भाव कमी होतील, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.
100 प्रतिकिलो काळी जातीची मिरची विकली जात आहे. यंदा उत्पादन जास्त होत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मी चार एकरांत उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे. त्यासाठी मिरचीचा तोडा निघेपर्यंत सुमारे चार लाखांचा खर्च आला आहे. आतापर्यंत तिसऱ्यांदा मिरची तोडण्यात आली आहे. यंदा भाव चांगला असल्यामुळे आर्थिक नुकसान टळले आहे. त्यामुळे तिखट मिरची आमच्यासाठी गोड झाली असल्याचं शेतकरी यांनी सांगितले.





