TRENDING:

तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे 2,000 रु हवे आहेत का? पात्रता अर्जप्रक्रिया काय आहे? जाणून घ्या सविस्तर

Last Updated:

Agriculture News : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “नमो शेतकरी महासन्मान” ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत असून, त्यांच्या जगण्याला आणि शेतीला हातभार लागत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “नमो शेतकरी महासन्मान” ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. येत्या 15 दिवसांमध्ये 7 वा हप्ता खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत असून, त्यांच्या जगण्याला आणि शेतीला हातभार लागत आहे. मात्र अनेकांना या योजनेसाठी पात्रता निकषांविषयी स्पष्ट माहिती नाही. पाहूया कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
agriculture news
agriculture news
advertisement

कोण पात्र आहेत?

1) महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी – या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.

2) शेतजमिनीचा मालक – अर्जदाराच्या नावावर शेतीची जमीन असावी. सातबारा उतारा किंवा 8 अ उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नोंद असणे बंधनकारक आहे.

3) लहान व अल्पभूधारक शेतकरी – कमी क्षेत्रफळावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

advertisement

4) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी व दिव्यांग शेतकरी – सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील शेतकऱ्यांना या योजनेत विशेष प्राधान्य आहे.

5) पीएम-किसान लाभार्थी शेतकरी – ज्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून हप्ते मिळतात, ते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त मदत दिली जाते.

advertisement

कोण अपात्र आहेत?

1) शासकीय कर्मचारी, निवृत्त अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि उच्च पदावर असलेले शेतकरी.

2) ज्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन आहे आणि ज्यांची वार्षिक उत्पन्न क्षमता ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त आहे.

3) शेतकऱ्याच्या नावावर शेती नसल्यास किंवा जमीन भाडेपट्ट्यावर घेतली असल्यास लाभ मिळणार नाही.

४) चुकीची कागदपत्रे सादर करणारे किंवा पूर्वी योजनेचा गैरवापर केलेले अर्जदार.

advertisement

योजनेतून मिळणारा लाभ

राज्य सरकारतर्फे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ठराविक आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. या मदतीचा उपयोग शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते, कीडनाशके खरेदीसाठी तसेच घरगुती खर्च भागविण्यासाठी करू शकतात. पीएम-किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांबरोबरच अतिरिक्त रक्कम दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसा उपलब्ध होतो.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड व पॅन कार्ड

advertisement

सातबारा उतारा किंवा 8 अ उतारा

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

बँक पासबुक

पीएम-किसान नोंदणीची प्रत (असल्यास)

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in

) वर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देखील मदत मिळू शकते. अर्ज मंजूर झाल्यानंतर मदतीची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते.

मराठी बातम्या/कृषी/
तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे 2,000 रु हवे आहेत का? पात्रता अर्जप्रक्रिया काय आहे? जाणून घ्या सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल