अपराजिता या शब्दाचा अर्थच असा आहे की जिला हरवले जाऊ शकत नाही. कदाचित याच कारणामुळे हे फूल विजय, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. शिवपूजेत हे फूल अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. ही फुले मनातील भीती कमी करतात आणि माणसाला आतून भक्कम बनवते, अशीही धारणा आहे. सध्याच्या काळातील रोजचा तणाव, कामाचा दबाव आणि पैशांच्या चिंतेत असतात, पूजेमध्ये हे फून आशेचे प्रतीक मानले जाते.
advertisement
आर्थिक अडचणींपासून सुटकेसाठी उपाय - घरात सतत पैशांची कमतरता जाणवत असेल, खर्च वाढत असतील किंवा बचत होत नसेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जावे. तिथे 11 अपराजिताची फुले शिवलिंगावर अर्पण करावीत. पूजेनंतर त्यातील एक फूल घरी परत आणावे. ते फूल वाळवून आपल्या पर्समध्ये, तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवून द्यावे. लोकांच्या मते यामुळे पैसा टिकू लागतो आणि विनाकारण होणारे खर्च कमी होतात. या उपायानंतर अनेकांना कमाईच्या नवीन संधी मिळाल्याचे अनुभव आहेत.
नोकरी आणि पदोन्नतीसाठी काय करावे - अनेकदा आपण काम तर पूर्ण करतो पण त्याला योग्य ओळख मिळत नाही. अशा वेळी महाशिवरात्रीला अपराजिताचे फूल अर्पण करताना शिव मंत्र किंवा ॐ नमः शिवाय चा जप किमान 51 वेळा करावा. पूजेनंतर ते फूल घरी आणून आपल्या कामाच्या टेबलावर (वर्क डेस्क), बॅगेत किंवा फाईलजवळ ठेवावे. यामुळे अडकलेली कामे पुढे सरकतात आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू लागते, अशी मान्यता आहे.
लग्न जुळण्यासाठी - लग्नाचे बोलणे वारंवार अडकत असेल, तर महाशिवरात्रीला दोन अपराजिताची फुले पाण्याने भरलेल्या तांब्यात टाकावीत. त्याच जलाने शिवलिंगावर अभिषेक करावा. त्यानंतर ती फुले घरी आणून अशा ठिकाणी ठेवावीत जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवता. यामुळे योग्य जोडीदार मिळण्याचा मार्ग मोकळा होतो आणि बोलणे लवकर पक्के होते, असे मानले जाते.
'वॅलेंटाइन डे'ला बिग सरप्राइज! या 4 राशींना मिळणार ड्रीम प्रपोजल, धाकधूक आनंदात
शिक्षण आणि करिअरमधील प्रगतीसाठी -विद्यार्थी किंवा नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी अपराजिताचे एक फूल आणि थोडे तांदूळ पांढऱ्या कपड्यात बांधून एक छोटी बॅग तयार करावी. ती 11 दिवस पूजेच्या ठिकाणी ठेवावी. 11 व्या दिवशी ती वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी. यामुळे एकाग्रता वाढते आणि परीक्षा किंवा मुलाखतीमध्ये आत्मविश्वास वाढतो, असे म्हटले जाते.
श्रद्धेसोबतच मेहनतही महत्त्वाची - धार्मिक उपाय मनाला शक्ती देतात, पण त्यासोबतच मेहनत, योग्य नियोजन आणि संयम तितकाच महत्त्वाचा आहे. अपराजिताचे फूल एक प्रकारे सकारात्मक विचारांचे प्रतीक आहे - की परिस्थिती कशीही असो, हार मानायची नाही. महाशिवरात्रीला उचललेले प्रत्येक छोटे पाऊल लोकांना नवीन आशा देते. हाच विश्वास कदाचित पुढे जाण्याची खरी ताकद बनतो.
