पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्वान लोक किंवा ब्राह्मणांचा अपमान करणं आणि हिंसा करणं. जो माणूस ज्ञानाचा आणि संस्कारांचा आदर करत नाही, त्याच्या आत्म्याचं नुकसान होतं. दुसरं मोठं पाप म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई-वडिलांचा, आपल्याला शिकवणाऱ्या गुरुंचा आणि देवाचा अपमान करणं.
advertisement
माघी अमावस्येला सालातील पहिलं सूर्यग्रहण; या 5 राशींचे नशीब मात्र लख्ख उजळणार
तसेच आई-वडिलांचं ऐकलं नाही किंवा त्यांच्याशी वाईट वागलं तर आयुष्यात खूप हाल सोसावं लागतं. तसंच परस्त्रीवर वाईट नजर ठेवणं, खोटं बोलणं, चोरी करणं किंवा मुक्या प्राण्यांची हत्या करणं या गोष्टी माणसाला अधोगतीकडे नेतात.
गरुड पुराण फक्त भीती दाखवत नाही, तर या चुका कशा सुधारायच्या हे सुद्धा सांगतं. आपल्याकडून काही वाईट घडलं असेल, तर देवाची भक्ती करणं, गंगा स्नान, दानधर्म करणं आणि आई-वडिलांची सेवा केल्यानं पापांचा भार कमी होतो. नेहमी खरं बोलणं, कुणालाही न दुखवणं आणि साधा आहार घेणं यामुळे मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध राहतात.
तयारी महाशिवरात्रीची! महादेवाच्या पिंडीवर या 5 गोष्टींनी अभिषेक करणे शुभफळदायी
थोडक्यात काय, तर आपलं आजचं जीवन आपल्या कर्माचा आरसा आहे; चांगलं वागलो तर सुख मिळतं आणि वाईट वागलो तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात, असे त्यात सांगितले आहे.
