कुठे असते विवाह रेषा?
आपल्या हाताचं जे सर्वात छोटं बोट असतं ज्याला आपण करंगळी म्हणतो, त्याच्या अगदी खाली एक छोटा उंचवटा असतो, त्याला बुध पर्वत म्हणतात. या उंचवट्यावर ज्या काही आडव्या रेषा दिसतात, त्यांनाच विवाह रेषा किंवा प्रेम रेषा म्हणतात. या रेषा तुमच्या लव्ह लाईफमध्ये किती गोडवा असेल हे सांगतात. जर इथे एकापेक्षा जास्त रेषा असतील, तर त्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रेमसंबंधांकडे इशारा करतात.
advertisement
प्रेम कहाणी अधुरी राहते?
असं कित्येकदा होतं की, जीवापाड प्रेम असूनही काही नाती लग्नापर्यंत पोहोचत नाहीत. जर एखाद्याच्या हातावर मंगळ आणि बुध पर्वतावर खूप जास्त फाटाफूट असेल किंवा तिथे बारीक-सारीक रेषांनी एकमेकांना कापलं असेल, तर समजावं की प्रेम प्रकरणात संघर्षाचे योग आहेत. अशा व्यक्तींना नात्यात वारंवार भावनिक धक्का बसू शकतो आणि काही वेळा त्यांची प्रेम कहाणी अर्धवट राहते.
श्रीमंत घर आणि सुखी संसाराचे योग - तुमचं लग्न एखाद्या बड्या प्रस्थाकडे किंवा श्रीमंत घराण्यात होईल की नाही, हे सुद्धा तुमच्या रेषा सांगतात. जर तुमची विवाह रेषा पुढे जाऊन सूर्य रेषेला (अनामिका म्हणजेच रिंग फिंगरच्या खालची उभी रेषा) टेकली, तर समजा तुम्ही खूप नशीबवान आहात. अशा लोकांचं लग्न खूप प्रतिष्ठित, श्रीमंत आणि संपन्न कुटुंबात होतं. पण, जर लग्नाच्या रेषेच्या शेवटी दोन फाटे फुटत असतील, तर मात्र संसारात विचारांचे मतभेद किंवा दुरावा येण्याची शक्यता असते.
मृत्युच्या आधी 6 महिन्यांपासून दिसतात अशा गोष्टी; आपली ओळखण्यात होते चूक
नात्यात स्थिरता आहे?
तुमच्या लग्नाची रेषा किती स्पष्ट आहे, यावरून तुमचं नातं किती टिकेल हे समजतं. जर ही रेषा अधूनमधून तुटलेली असेल किंवा साखळीसारखी दिसत असेल, तर प्रेम आणि संसारात खूप चढ-उतार येऊ शकतात. अशा लोकांना नातं टिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याउलट, ज्यांच्या हातावरची ही रेषा एकदम सरळ, स्पष्ट आणि कोणत्याही खाचाखूचांशिवाय असते, ते लोक खूप लकी असतात. हे एका सुखद, लांब आणि प्रेमळ वैवाहिक आयुष्याचं लक्षण मानलं जातं.
