आत्म्याच्या प्रवासात अडचणी येण्याची शक्यता - ग्रहण किंवा सूतक काळात अंत्यसंस्कार केल्यास त्याचा वाईट परिणाम कुटुंबावर होऊ शकतो. मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या पुढील प्रवासात कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी अंत्यसंस्कारासारखा महत्त्वाचा वैदिक विधी ग्रहण काळात करणे योग्य मानले जात नाही. सूतक काळात आपण स्वतःच्या शुद्धीकरणावर भर देतो आणि देवपूजा स्थगित ठेवतो. या काळात संवेदनशीलता वाढलेली असल्याने, ग्रहण पूर्णपणे संपेपर्यंत अंत्यविधी थांबवणे शास्त्रोक्त मानले जाते. ग्रहण लागण्यापूर्वी काही तास सूतक काळ सुरू होतो आणि ग्रहण सुटल्यावरच तो समाप्त होतो.
advertisement
सामाजिक प्रतिमेला तडा! 4 राशींवर मोठं संकट; 48 तासात मंगळ-राहुची अभद्र युतीमुळे
ग्रहण काळात मृत्यू झाल्यास काय करावे?
जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ग्रहण सुरू असतानाच झाला, तर अशा परिस्थितीत पार्थिव शरीर सुरक्षित ठेवावे. जोपर्यंत ग्रहण पूर्णपणे सुटत नाही आणि मोक्ष काळ (ग्रहण समाप्ती) येत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू करू नये. ग्रहणाचा कालावधी साधारणपणे काही तासांचाच असतो, त्यामुळे थोडा वेळ वाट पाहणेच श्रेयस्कर आणि शुभ मानले जाते. तसेच सूतक काळातही अंत्यसंस्कार करणे टाळावे, असे जाणकार सांगतात.
मेष वृषभ मिथुन कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा लकी, पण
ग्रहण संपल्यानंतरची प्रक्रिया - जेव्हा ग्रहण पूर्णपणे समाप्त होते, त्यानंतर पार्थिव शरीरावर गंगाजल शिंपडून त्याचे शुद्धीकरण करावे. ग्रहण सुटल्यानंतर स्नान आणि दानधर्माला विशेष महत्त्व असते, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी स्नान करून शुद्ध व्हावे आणि त्यानंतरच विधीवत अंत्यसंस्कार पार पाडावेत. असे केल्याने मृत आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत.
