दिव्याने उलगडला त्या धमकीमागचा अर्थ
नॅशनल टेलिव्हिजनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दिव्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यावर आपली बाजू मांडताना दिव्या म्हणाली, "लोकांनी माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला. जे लोक वैचारिक आहेत, त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक असते, स्वाभिमानाची असते. या संविधानिक देशात कोणी खरंच तलवार घेऊन कोणाला मारायला जाणार आहे का? माझी तलवार ही माझ्या विचारांची आणि माझ्या माजाची आहे. मी बिग बॉसला १०० वेळा सांगितलं होतं की मला घराबाहेरचं बोलायला लावू नका, पण तिथे कोणीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं."
advertisement
The 50 मध्ये मोठा ट्विस्ट, जान्हवी किल्लेकरनंतर निक्की तांबोळीचाही पत्ता कट? कोणी दिला धोका?
"विषय संपला नाही, आता सुरू झालाय!"
घरातून बाहेर पडताच दिव्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून दिली होती. "जय भीम, जय शिवराय" म्हणत तिने महाराष्ट्र आणि जगभरातून तिला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण त्याचसोबत, "आता विषय सुरू झालाय" असं म्हणत तिने बिग बॉसच्या मेकर्सना आणि तिला टार्गेट करणाऱ्या सदस्यांना सूचक इशारा दिला. दिव्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात बिग बॉसच्या आतल्या गोष्टी चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रकार परिषदेत भावूक क्षण
बिग बॉसच्या घरातील घडामोडींबद्दल बोलताना दिव्याच्या डोळ्यांत पाणी आलं. आपली बाजू मांडण्याची योग्य संधी न मिळाल्याची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरीही, तिने आपलं म्हणणं ठामपणे मांडलं. दिव्याच्या मते, तिला जाणीवपूर्वक अशा कोपऱ्यात ढकललं गेलं जिथे तिचा संताप अनावर व्हावा. या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा दिव्याच्या समर्थकांचा आणि विरोधकांचा मोठा राडा पाहायला मिळत आहे.
