या चित्रपटाबाबत काही काळापूर्वी वाद निर्माण झाला होता. परेश रावल यांनी अचानक चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी आली होती. सोशल मीडियावर चाहत्यांनी यावर संताप व्यक्त केला. लोक म्हणत होते की हे सगळं एक 'पब्लिसिटी स्टंट' आहे. पण आता खुद्द अक्षय कुमारने यावर भाष्य करत स्पष्ट केलं आहे की, "हे प्रसिद्धीसाठी नव्हतं. हे प्रकरण कायदेशीर पातळीवर गेलं होतं. पण आता सर्व काही ठीक आहे."
advertisement
श्रावणातील उपवास मटण खाऊन सोडला, अभिनेत्रीने शेअर केला VIDEO, नेटकऱ्यांनी घेतलं धारेवर
परेश रावल यांनी नुकतंच एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत लिहिलं "लवकरच, पुढच्या पावसाळ्यापूर्वी." त्यामुळे अनेकांनी अंदाज लावला की 2026 च्या सुरुवातीला हेरा फेरी 3 थिएटरमध्ये झळकणार. चित्रपटात पुन्हा एकदा 'बाबू भैय्या' (परेश रावल), 'श्याम' (सुनील शेट्टी) आणि 'राजू' (अक्षय कुमार) हे तीन मस्त मित्र दिसणार आहेत. नव्या भागात काही नवीन पात्रांची एंट्री होईल का, हे अजून गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत असून, यावेळी कथा अधिक भन्नाट आणि आटपाट नगरीत नेणारी असेल, अशी चर्चा आहे. फॅन्ससाठी ही एक नॉस्टॅल्जिक ट्रिप असणार आहे.
'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना खूप हसवले होते आणि त्यांचे डायलॉग्स आजही मीम्सच्या माध्यमातून लोकप्रिय आहेत. राजू, श्याम आणि बाबूराव या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे, हे तिघे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याने प्रेक्षक 'हेरा फेरी 3' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
