परंतू अभिषेक बॅनर्जीने याविषयी भाष्य केलं आहे. अभिनेता म्हणाला बॉलिवूडमध्ये आता दोन अभिषेक आहेत, एक जो लिहितो आणि दुसरा जो अभिनय करतो. पुढे अभिनेता म्हणाला कृपया तुम्ही खऱ्या लेखकाला क्रेडिट द्या, ही त्यांची मेहनत आहे. मी अभिनेता आहे आणि तो अभिषेक बॅनर्जी लेखक आहे. अभिनेत्याने यावर पुढे स्पष्ट भाष्य केलं असून म्हटलं आहे की मी कधी काही लिहू शकत नाही कारण माझ्याकडे एका लेखकाकडे असलेली नजर नाही आणि जर मी काही लिहिलच तर मी माझ्या ऑडिशनच्या आधीच रिजेक्ट होइन. त्यामुळे कधीही काही चांगलं लिहिलेलं आढळलं तर तो अभिषेक बॅनर्जी मी नकीच नसेन.
advertisement
दरम्यान अभिनेता अभिषेक बॅनर्जी व लेखक अभिषेक बॅनर्जी हे दोघे एकमेकांचे जुने मित्र असून अभिनेत्याने याबद्दल बोलताना सांगितलं की इंडस्ट्रीत स्ट्रगल करत असताना मी अभिषेकला म्हणालो होतो की तू तुझं नाव बदलं कारण जर पुढे जाऊन माझं मोठं नाव झालं तर तू जे काही लिहिलं असेल त्यासाठी लोक मलाच क्रेडिट देतील आणि आता अभिनेत्याचं हे वाक्य खरं झाल्याचं पाहायाला मिळतंय.
अभिषेक बॅनर्जीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'मिर्झापूर' या वेब सीरीजवर आधरित आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त तो मैडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिवर्स या प्रॉजेक्टचाही भाग असणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सूक्ता आहे.
