वैयक्तिक आयुष्यात मोठे चढ-उतार
भार्गवीने तिच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. ‘अनुबंध’, ‘वहिनीसाहेब’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. मोठ्या पडद्यावरही तिने ‘संदूक’, ‘वन रूम किचन’, ‘लालबत्ती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली.
advertisement
मात्र, जितकं तिचं प्रोफेशनल आयुष्य यशस्वी राहिलं, तितकंच वैयक्तिक आयुष्य अनेक कठीण प्रसंगांनी भरलेलं होतं. घटस्फोट आणि वडिलांचे निधन – या दोन मोठ्या घटनांनी तिच्या आयुष्याला कलाटणी दिली. पण, भार्गवी या संघर्षातून स्वतःला सावरत पुढे जात राहिली.
"मी सिंगल आहे, पण मी आनंदी आहे!"
एका मुलाखतीत भार्गवीने तिच्या घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल उघडपणे सांगितलं. ती म्हणाली, "माझ्या वडिलांचं जाणं आणि घटस्फोट – हे दोन्ही प्रसंग माझ्यासाठी खूप अवघड होते. पण मी कधीही थांबले नाही. मी काम करत राहिले. आता मागे वळून पाहताना वाटतं, ‘ठीक आहे, मी सिंगल आहे, पण मी आनंदी आहे!’ मी हवं ते काम करतेय, माझ्या मनाप्रमाणे जगतेय. मला कोणत्याच गोष्टीची भीती उरलेली नाही."
