‘ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!’ सीन नेमका कसा शूट झाला याविषयी विकी कौशलने सांगितलं. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्याने या सीनविषयी खुलासा केला.
आता 'छावा'ला थांबवणं शक्य नाही, दुसऱ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन
‘ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!’ सीन स्क्रिप्टमध्ये नव्हता, तरीही कसा झाला शूट?
advertisement
चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये या सीनचा समावेश नव्हता. मात्र, शूटिंगदरम्यान कलाकारांच्या भूमिकेमधील इन्टेन्सिटी आणि त्या प्रसंगाची गरज लक्षात घेऊन दिग्दर्शकांनी हा सीन एक्सटेम्पोर (तत्काळ) शूट करण्याचा निर्णय घेतला. खरंतर स्क्रिप्टमध्ये नसतानाही विकी कौशलने हे वाक्य घेतलं. त्याचा हा सीन आणि डायलॉग पाहून दिग्दर्शकही थक्क झाले.
तो फक्त एक संवाद नसून, तो त्या क्षणी असलेल्या भावना, उर्जा आणि जिद्दीचं प्रतीक असल्याचं विकी कौशल म्हणाला. सर्व मावळ्यांना युद्धासाठी जाण्याअगोदर हे स्पीच होतं ज्यामुळे ते ऑलरेडी युद्धात गेलेले असतात. मला दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की स्पीचमध्ये एवढी एनर्जी पाहिजे की स्पीच संपल्यावर लोक विचाराने ऑलरेडी युद्धाच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तेव्हाच एक मेन्टल नोट होतं की, शेवटी मी ही लाईन घेणारच. मग मी ‘ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!’ ही लाईन घेतली. याविषयी कोणालाच माहित नव्हतं तरीही सर्वांनी याला कोरस दिला. त्यामुळे ती जी रिअॅक्शन आली ती सगळ्यांची नॅचरल रिअॅक्शन होती. त्यावेळी त्यांना जे फील होत होतं त्यांनी तसंच रिअॅक्ट केलं, असं विकी कौशलने सांगितलं.
लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं की, हा सीन स्क्रिप्टमध्ये नव्हताच तरीही विकी त्याच्या मनाने ‘ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!’ ही लाईन घेतली आणि या लाईनने मॅजिक क्रिएट केला. सीन झाल्यावर मी त्याला जाऊन पहिली मिठी मारली. आणि अशा प्रकारे हा सीन स्क्रिप्टमध्ये नसतानाही शूट झाला.
दरम्यान, 'हर-हर महादेव' हा केवळ एक मंत्र नाही, तर तो पराक्रम, निष्ठा आणि लढाऊ वृत्तीचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या लढायांमध्ये हा जयघोष केला जात असे, जो योद्ध्यांना प्रचंड प्रेरणा देत असे. त्यामुळे ‘छावा’ चित्रपटात या घोषणेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा हा सीन आहे.
कलेक्शनमध्येही सिनेमाने डरकाळी फोडली. दोन दिवसात सिनेमाने जोरदार कलेक्शन केलं. विकी कौशलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्याचे कलेक्शन 36.5 कोटी रुपये होते.