अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याबद्दल मीम्स व्हायरल होत आहेत. 'तेवर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र चित्रपट संपल्यानंतर त्यांचं नातं तुटल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. आता अर्जुनने एका मुलाखतीत सोनाक्षीसोबत ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.
advertisement
सोनाक्षीविषयी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता की, 'काही नाती दीर्घकाळ टिकतात पण काही टिकत नाही. ती त्या चित्रपटापूर्तीच मर्यादित राहतात, कारण त्यानंतर लोक आपापल्या मार्गाने पुढे जातात. एक व्यक्ती म्हणून मी अजूनही तिच्यावर खूप प्रेम करतो.'
तो पुढे म्हणाला होता, 'आम्ही पार्ट्यांमध्ये कधी भेटलो तरी जास्त बोलत नाही, गप्पा मारत नाही. पण एकमेकांना ओळख नक्कीच दाखवतो. आमच्या दोघांवर कोणाचं दडपण नव्हतं.' असा खुलासा अर्जुन कपूरने केला होता.
एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'सोनाक्षी खूप इमोशनल मुलगी आहे. तिला ज्या लोकांची काळजी आहे त्यांच्याबद्दल ती तिच्या भावना लपवत नाही. दुसरीकडे अर्जुन हा अधिक शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. बहुतेक मुलींप्रमाणेच सोनाक्षीलाही सतत त्याच्या आसपास राहायचं होतं. पण सततचा सहवास आणि कॉल्समुळे अर्जुन कपूरला थोडी चिडचिड होत होती. त्यामुळेच त्यांनी सहमताने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी लवकरच तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. वृत्तानुसार, सोनाक्षी आणि झहीर 23 जून रोजी रजिस्टर लग्न करणार आहेत. यानंतर संध्याकाळी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
