हिवाळ्याच्या हंगामात या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि या हंगामात विशेषतः गाजर आणि बीटरूटचा रस खातात. या ज्यूसमध्ये पालक टाकणं आणखी फायदेशीर ठरू शकतं. याव्यतिरिक्त, गाजर, बीटरूट आणि पालकचा रस प्यायल्यानं आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. वजन कमी करणं, तसंच पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील या रसाचा उपयोग होतो. या रसामध्ये भरपूर जीवनसत्त्व, खनिजं आणि अँटीऑक्सिडंट असतात.
advertisement
Reels Addiction : रिल्स पाहण्याचं घातक व्यसन, सोशल मीडियाच्या अधीन होऊ नका, मेंदू शाबूत ठेवा
हंगामी आजारांपासून रक्षण
पालक, गाजर, बीट ज्यूसमुळे हंगामी आजारांचा धोका कमी होतो. या ज्यूसमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. गाजरांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. बीट आणि पालकामध्ये आढळणारी पोषक तत्व हंगामी आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.
बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या
बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या कमी करण्यासाठी, गाजर, बीट आणि पालकाचा रस उपयुक्त ठरू शकतो. या रसामुळे पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. शरीरही डिटॉक्स होतं.
Skin Care : चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा, ग्लो राहिल कायम
रक्तासाठी पोषक
पालक आणि बीटामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, त्यामुळे शरीरातील अशक्तपणाची भरुन निघण्यास मदत होते.
त्वचेसाठी उपयुक्त
गाजर, बीट आणि पालकाचा रस प्यायल्यामुळे त्वचा आतून चमकण्यास मदत होईल. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हा ज्यूस फायदेशीर आहे.