एकटेपणामुळे दर तासाला सुमारे 100 लोकांचा मृत्यू होतो. ही आकडेवारी वर्षाला सुमारे 8 लाख 71 हजार इतकी आहे. अहवालानुसार, जवळजवळ सर्व वयोगटातील लोक एकटेपणाने ग्रासलेले आहेत. मात्र, तरुण समाज आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये या गंभीर आजाराचे प्रमाण अधिक आहे.
कुणाला जास्त धोका?
हा आजार जवळजवळ सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करत असला तरी, तरुण आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे. 13 ते 29 वयोगटातील 17-21 टक्के लोक या समस्येने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते, मुख्यत्वे खराब आरोग्य, उत्पन्नाचा अभाव, शिक्षण आणि सामाजिक सुविधांचा अभाव लोकांना एकटे पाडत आहे.
advertisement
अनेक लोक शारीरिक अपंगत्वामुळे तसेच सांस्कृतिक अडथळ्यांमुळे समाजापासून दूर गेले आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर भेदभाव देखील केला जातो, ज्यामुळे ते एकटे पडतात. यामुळे स्ट्रोक, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढला आहे. याच कारणामुळे अनेकांचा अकाली मृत्यू होत आहे.
WHO चा सल्ला
जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी विवेक मूर्ती म्हणाले, "एकटेपणा सध्या जगासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे." या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, WHO स्वतःला समाजात मिसळण्याचा आणि आध्यात्मिक संवाद साधण्याचा सल्ला देते. उत्तम आरोग्य राखण्यासाठी आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी हेच एकमेव मार्ग आहेत. निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी आपल्या ओळखीचा परीघ वाढवणे हा एक उत्तम मार्ग आहे. स्वतःला अधिक सामाजिक बनवणे महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा : कपडे न घालणार गाव! 90 वर्षांपासून चालत आलीय अनोखी परंपरा; कारण ऐकून थक्क व्हाल!
हे ही वाचा : सावधान, ही एक चूक पडेल महागात! Google वर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, नाहीतर जाल थेट तुरुंगात!