बिकानेर, 6 डिसेंबर : बाजारात यावेळी हंगामानुसार भाजीपाला येत आहे. अशामध्ये एक भाजी अशी आहे, ज्याची लोक भाजी बनवून खातात. हिवाळ्यात या भाजीला इतकी मागणी असते की, लोक ही भाजी बाजरीची भाकरी आणि भातासोबत खातात.
आता बाजारात हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. या हरभऱ्याची लागवड राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. येथे देशी-विदेशी पर्यटकांना ही भाजी खूप आवडते. याबाबत दुकानदार मीरू खान यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, बाजारात आता हिरवा हरबरा आला आहे. हा हरबरा बाजारात 160 रुपये किलोने विकला जात आहे. सध्या जयपूरहून हरभऱ्याची आवक होत आहे.
advertisement
बिकानेरमध्येही मोठ्या प्रमाणात लोक हरभऱ्याची लागवड करतात. आतापर्यंत हरभऱ्याची पेरणी झाली आहे. ती मार्चपूर्वी बाजारात पोहोचणार आहे. हे हरभरे ताजे राहावेत म्हणून पाण्यात ठेवले जातात. हरभऱ्यासोबतच त्याच्या पानांपासून भाजीही बनवली जाते. या भाजीचे सेवन केल्याने आपल्या शरीरात ऊर्जा येते.
आयुर्वेदिक डॉक्टर अमित गेहलोत सांगतात की, बिकानेरमध्ये हरभऱ्याची लागवड केली जाते. लोक या हरभऱ्याचा त्यांच्या आहारात समावेश करतात. त्यांना हरबऱ्याची भाजी किंवा कच्च्या स्वरूपात खायला आवडते. हिरवे हरभरे खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि खनिजे आढळतात.
हे खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. याशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्याने शरीर मजबूत आणि निरोगी राहते. हरबरा खाल्ल्याने तुमच्या शरीरात घोड्यासारखी स्फूर्ती येते.
