TRENDING:

Pitta Dosha : पित्त कशामुळे होतं ? पित्ताचे शरीर आणि मनावर कोणते परिणाम जाणवतात ? पाहूया आयुर्वेदिक उपाय

Last Updated:

आयुर्वेदानुसार, पित्त असंतुलनामुळे अंतर्गत कमकुवतपणा आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते, ज्यामुळे शरीर आणि मन दोन्हीमधे अस्वस्थता येते. यावर आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एखाद्या गोष्टीवर आपली प्रतिक्रिया काय असते हे केवळ त्या परिस्थितीवर नाही तर त्याक्षणी आपली प्रकृती कशी आहे यावरही अवलंबून आहे.
News18
News18
advertisement

सतत राग येणं, चिडचीड होणं, ताण येणं हे केवळ प्रतिकूल परिस्थितीवर अवलंबून नसतं. ही लक्षणं पित्त दोषाच्या असंतुलनामुळे असू शकतात, जो आपल्या भावनिक भावनांवर नियंत्रण ठेवतो. आयुर्वेदानुसार, पित्त असंतुलनामुळे अंतर्गत कमकुवतपणा आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते, ज्यामुळे शरीर आणि मन दोन्हीमधे अस्वस्थता येते.

Sleep Pattern:कुणाला किती झोप आवश्यक, युनानी चिकित्सा पद्धतीत सांगितलेलं महत्त्व

advertisement

आयुर्वेदात पित्त दोषाला खूप महत्वाचं मानलं जातं कारण त्याचे परिणाम केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील जाणवतात. त्याच्या असंतुलनामुळे राग, चिडचिड, अस्वस्थता, पोटात जळजळ आणि मानसिक अशांतता या भावना उद्भवू शकतात. कारण नसताना रडावंसं वाटतं, संध्याकाळी अस्वस्थता वाढते. आयुर्वेदानुसार, पित्त दाबलं जाण्यापेक्षा ते थंड व्हावं यासाठी त्याला पूरक संतुलित आणि निरोगी दिनचर्या आवश्यक आहे, यामुळे पित्त शांत होतं.

advertisement

पित्त शांत करण्यासाठी प्रमुख आयुर्वेदिक उपाय -

  • आयुर्वेदात पित्त शांत करण्यासाठी आणि संतुलित करण्यासाठी अनेक पद्धतींचं वर्णन करण्यात आलंय. त्यापैकी पहिलं पित्त-शामक पेय आहे. हे पेय जिरं, बडीशेप, सुंठ आणि द्राक्षाचा रस मिसळून बनवलं जातं. हे पेय पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करतं, ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या कमी होते.
  • advertisement

  • पित्त शामक - त्यात अविपत्तीकर चूर्ण असतं, यामुळे मन आणि शरीर शांत करण्यास मदत होते आणि ताण आणि चिंता नियंत्रित करता येते. ते कधीही कोमट पाण्यासोबत घेतले जाऊ शकते, पण हे वापरण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Thirst : बाहेरचं अन्न खाऊन तहान जास्त लागते ? समजून घेऊया नेमकं काय घडतं ?

advertisement

  • तिसरी पद्धत म्हणजे तूप नस्य - यासाठी रात्रीच्या वेळी नाकपुड्यात शुद्ध तुपाचे काही थेंब टाका. या पद्धतीमुळे मन शांत होण्यास मदत होते. नाकात तूप घालण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही ते बोटांनी नाकात लावू शकता.
  • याव्यतिरिक्त, अभ्यंग म्हणजेच मसाज मन आणि शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. अभ्यंग शरीरातील अग्नि शांत करतं आणि खाज निर्माण करणारी जळजळ आणि खाज कमी करतं. नारळ आणि भृंगराज तेल टाळू आणि पायांच्या तळव्यला लावल्यानं आराम मिळतो.
  • हर्बल टी - पित्त शांत करण्यासाठी हर्बल टी पिऊ शकता. ते बनवण्यासाठी कॅमोमाइल, तुळस आणि गुलाबजल पाण्यात एकत्र उकळा आणि हा चहा प्या. यामुळे मन शांती होतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेलसारखी चव, घरीच बनवा सोप्या पद्धतीने कोळंबी भात, रेसिपीचा Video
सर्व पहा

हे कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं नक्की घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pitta Dosha : पित्त कशामुळे होतं ? पित्ताचे शरीर आणि मनावर कोणते परिणाम जाणवतात ? पाहूया आयुर्वेदिक उपाय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल