तब्बल ४०० कोटी रुपयांच्या कथित प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. ४०० कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणाचा सीआयडी तपास करणार आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टवरच मोठा संशय निर्माण झाला आहे. नाशिक पोलिसांनी तक्रारदार संदीप पाटीलने खोटी तक्रार केल्याचा दावा केला होता. तर नाशिक पोलिसांच्या तपासावर तक्रारदार संदीप पाटीलनेच गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता सीआयडीकडून या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी जाणार आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील चोरला घाटातून ४०० कोटी रुपयांचे ट्रक चोरीला गेल्याचं प्रकरण देशभरात चर्चेत आलं होतं.
कर्नाटकमधील चोरली घाटात ही १६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. २००० रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला हा कंटेनर होता. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या तपासातून ही ४०० कोटी रुपयांची घटना उजेडात आली होती. या प्रकरणी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी, जनार्दन धायगुडे (मुंबई) याच्याविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी संदीप पाटील नावाच्या तरुणाने एका व्हिडीओमध्ये हा धक्कादायक खुलासा केला होता. पण, संदीप पाटील यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. आरोपींनाा कोर्टात हजर केलं आणि जाामीनही मिळाला. नााशिक पोलिसांनी प्रकरण बंदही केलं होतं. पण, आता सीआयडी काय तपास करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
