वेळापत्रकात काय बदल झाले?
उद्या, रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून ग्रहणाचा वेध सुरू होईल. रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होणार असून, मध्यरात्री 1 वाजून 26 मिनिटांनी ग्रहण संपेल. हा एकूण पर्वकाळ 3 तास 30 मिनिटांचा असेल.
यामुळे नेहमी रात्री होणारी देवीची शेजारती उद्या होणार नाही. ग्रहणादरम्यान मंदिर दर्शनासाठी खुले राहील. ग्रहण संपल्यानंतर देवीला स्नान घालून, पूजा करण्यात येईल आणि त्यानंतरच शेजारती केली जाईल. त्यानंतरच मंदिर बंद होईल. सोमवारपासून मात्र नेहमीच्या वेळेनुसार पहाटे मंदिर उघडून सर्व धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू होतील, ही माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने दिली आहे.
advertisement
हे ही वाचा : Chandra Grahan 2025: या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण पाहू नये; अघटित घडण्याची भीती, संकट ओढावेल
हे ही वाचा : Aajache Rashibhavishya: बाप्पांची कृपा होणार, तुमचं नशीब पालटणार, अनंत चतुर्दशीला ती चूक नको! आजचं राशीभविष्य