TRENDING:

बापाचा संत्रा बागावर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय, मुलानं दिला नकार, AI च्या मदतीने मिळवणार 30 लाखांचा नफा

Last Updated:

Farmer Success Story : शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास काय बदल घडू शकतो याचे ज्वलंत उदाहरण अमरावती जिल्ह्यातील विजय बिजवे या शेतकऱ्याने घडवून आणले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास काय बदल घडू शकतो याचे ज्वलंत उदाहरण अमरावती जिल्ह्यातील विजय बिजवे या शेतकऱ्याने घडवून आणले आहे. नापिकीमुळे संत्रा बाग तोडण्याचा निर्णय घेतलेल्या बिजवे यांना त्यांच्या कृषी पदवीधर मुलाने थांबवलं आणि AI (Artificial Intelligence) चा वापर करून शेतीत नवा प्रयोग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर केवळ दोन वर्षांत त्यांनी उत्पन्नात क्रांती घडवली.
agriculture news
agriculture news
advertisement

बाग तोडून शेती विकण्याचा विचार

परतवाडा तालुक्यातील खरपी गावात विजय बिजवे यांची आठ एकरांची संत्रा बाग आहे. गेली दहा वर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करत असूनही त्यांना उत्पन्नात फारसा फायदा होत नव्हता. खर्च वाढत चालला होता आणि उत्पादन मात्र घटत होतं. परिणामी, संत्रा बाग तोडून शेती विकण्याचा विचार विजय बिजवे यांनी केला होता.

advertisement

मुलाने केला AI चा वापर

मात्र त्यांच्या मुलाने, जो B.Sc. Agriculture शिकलेला आहे, त्यांनी या निर्णयाला विरोध केला आणि शेवटचा प्रयत्न म्हणून AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह केला. विजय बिजवे यांनी मुलाच्या सल्ल्यानुसार शेतीचे गुगल मॅपिंग करून घेतले आणि ‘Map My Crop’ या पुण्याच्या कंपनीच्या साहाय्याने मायक्रो सेन्सर बसवले.

या सेन्सरच्या माध्यमातून बिजवे यांना त्यांच्या जमिनीतले पाणी, ओलावा, तापमान, मातीतील पोषणतत्त्वे आणि पीक वाढीबाबत अत्यंत अचूक माहिती मिळू लागली. या माहितीच्या आधारे त्यांनी झाडांना आवश्यक तेवढेच पाणी, खते व औषधे वापरली. परिणामी खर्चात बचत झाली आणि फळांची वाढ अधिक गुणात्मक झाली.

advertisement

पूर्वी एका झाडावर 200-300 संत्री मिळत होते, आता ती संख्या 800 ते 1200 फळांपर्यंत पोहोचली आहे. पूर्वी आठ एकर बागेसाठी 5.5 लाख रुपये खर्च आणि 5-6 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. पण AI वापरल्यावर खर्च 4 लाखांपर्यंत कमी झाला आणि उत्पन्न 25 ते 30 लाख रुपये होण्याची शक्यता आहे.

जैविक फवारणीचा उपयोग

advertisement

याशिवाय, विजय बिजवे यांनी झाडावर येणाऱ्या मावा रोगावर रासायनिक फवारणी टाळून गूळ, साखर व दूध मिश्रणाची सेंद्रिय फवारणी केली. यामुळे मधमाशांचा वावर वाढला आणि परागसिंचन (pollination) सुधारले. परिणामी, फळगळ थांबली आणि फळांची गुणवत्ता अधिक चांगली झाली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

विजय बिजवे यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. मात्र त्यांनी शेवटी एक मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे की, “उत्पादन वाढलं, पण मार्केटिंग यंत्रणा नाही. व्यापाऱ्यांच्या मर्जीनं दर द्यावा लागतो.” त्यामुळे त्यांनी अमरावती जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्प, थेट मार्केट जोडणी आणि वाहतुकीसाठी द्रुत व्यवस्था निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. शेतीतील AI चा हा प्रयोग म्हणजे बदलत्या कृषी व्यवस्थेची नांदी आहे, जे शेतीला फायदेशीर बनवू शकते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
बापाचा संत्रा बागावर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय, मुलानं दिला नकार, AI च्या मदतीने मिळवणार 30 लाखांचा नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल