मुंबईकरांनी महायुतीला भरभरून साथ दिल्यानंतर महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बुधवारी सकाळी ११ वाजता संपन्न झाली. महापौरपदासाठी रितू तावडे तर उपमहपौरपदासाठी संजय घाडी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषित करण्यात आली. महायुतीच्या सदस्यांनी यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला तसेच महायुतीच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. परंतु निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना दोन्ही बाजूकडील सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
advertisement
शिवसेनेच्या गटनेत्या पेडणेकरांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदवला
निवडणुकीची प्रक्रिया सुरू करताच शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदवला. महापालिकेत तब्बल सातवेळा निवडून आलेल्या श्रद्धा जाधव यांच्यावर जबाबदारी देण्याऐवजी प्रशासनाने परंपरा मोडीत काढण्याला पसंती दिल्याचे म्हणत शासनावर आरोप केले. यावेळी ठाकरे सेनेच्या नगरेसेवकांनी निषेध निषेध म्हणत पेडणेकरांना साथ दिली. त्यावर सरकारी नियम सांगत तुमचा आक्षेप चुकीचा असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले
जय श्रीराम, देवाभाऊ आगे बढो, महायुतीचा विजय असो... अशा घोषणा सेना-भाजपचे नगरसेवक देत होते. तर उद्धव ठाकरेंचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो... अशा घोषणा सेनेचे नगरसेवक देत होते. दोन्ही बाजूकडील सदस्यांच्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले होते.
महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
मुंबई मनपात यापूर्वी एकदा आलो होतो. मुंबई महापालिकेचे कामकाज प्रत्यक्ष उपस्थित राहून मी पहिल्यांदा पाहिले. मुंबई क्विन गॅलरीत पहिल्यांदा बसलो. मुंबईत महायुतीची सत्ता आली याचा विशेष आनंद आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली मुंबई करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. लोकांना लोकशाहीचे राज्य अपेक्षित आहे, असे महापौर-उपमहापौर निवडणुकीनंतर फडणवीस काय म्हणाले.
