अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडून व्हावा, अशी मागणी पवार कुटुंबाने केली. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून सीआयडी चौकशीची शिफारस केली. त्यानंतर तपासाची सूत्रे हातात घेतलेल्या सीआयडीने आतापर्यंत काय काय केले? याची माहिती देण्यासाठी सीबीआयचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
गुन्ह्यामागे घातपात असल्याचे पुढे आले तर....
advertisement
अजित पवार यांच्या अकस्मित मृत्यूमागे घातपात आहे का? हा तपासाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत अपघातामागे गुन्हेगारी कट आहे का? अशा दिशेने तपास सुरू आहे. गेल्या २८ दिवसांपासून आम्ही तपास करीत आहोत. यामध्ये आमच्या हाताला काही महत्त्वाच्या गोष्टी लागलेल्या आहेत. पहिल्या दिवसापासून अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने तपास सुरू आहे. AAIB यांच्याशी सातत्याने सीआयडीचा समन्वय असून गुन्ह्यामागे घातपात असल्याचे पुढे आले तर गुन्हा दाखल करून उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयात अभियोग चालविण्यासंबंधी पावली टाकली जातील, अशी महत्त्वाची माहिती सुनील रामानंद यांनी दिली.
तपासात बरीच प्रगती, आमच्या हाताला महत्त्वाचे पुरावे लागले आहेत
जर या तपासात घातपात, षडयंत्र, किंवा तत्सम काही गोष्टी समोर आल्या तर त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल. राज्य सरकारने या प्रकरणात तपास सीबीआयने ताब्यात घ्यावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. विमान कंपनीबाबत डीजीसीएच्या अहवालानुसार इतर एजन्सीचचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तपासात बरीच प्रगती आहे, वेगात तपास सुरू आहे. एएआयबीच्या तांत्रिक तपासाच्या अहवालाचाही समावेश या तपासात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
