दरम्यान भुजबळ यांच्या राजीनाम्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गडचिरोलीमध्ये आले असता फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अधिक विस्तारानं सांगू शकतील, पण मुख्यमंत्र्यांनी किंवा मी त्यांचा राजीनामा स्विकारलेला नाही, असा खुलासा फडणवीस यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर केला आहे.
advertisement
छगन भुजबळांचा सरकारला प्रश्न
मनोज जरांगे पाटील यांनी 27 जानेवारीला गुलाल उधळला. मग पुन्हा उपोषणाला का बसणार आहेत? ज्याला अध्यादेश आणि मसुद्यातील फरक कळत नाही. चार दिवसांपासून उन्माद सुरू आहे. ओबीसींच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते. आम्ही जिंकलो म्हणून जल्लोष करताय. मग उपोषण कशासाठी? असा प्रश्न भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना केला आहे. एक एक गोष्ट मागण्यासाठी राज्यातील लोक भांडत असतात त्यांना काही मिळत नाही. मात्र, यांनी उपोषण करणार म्हटलं की लगेच सरकारची धावाधाव होते. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. वेगळं आरक्षण द्या हरकत नाही. मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही. मात्र, तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेलात आणि जाहीर केलं की मी घेतलेली शपथ पूर्ण केली. मग शपथ पूर्ण झाली आहे. तर हे सर्वेक्षण कशासाठी? आयोगाचं खोटं सर्वेक्षण सुरू आहे. 180 प्रश्न आहे, एका घराला दीड तास लागतो. मग एव्हढ्या कमी वेळेत कसं सर्व्हेक्षण झालं? फक्त जात विचारली जाते आणि बाकी ऑफीसमध्ये भरलं जातंय, असा गंभीर आरोप भुजबळ यांनी सर्वेक्षणावर केला आहे.
