आमगाव, सालेकसा तालुका हे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील तालुके असून आमगाव सालेकसा मार्गावरील कावराबांध येथे अनुदानित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित जी. के. कला व विज्ञान महिला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी भागातील मुले, मुली सायकल किंवा पायी या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात. यापूर्वी या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे परीक्षा केंद्र एक किलोमीटर अंतरावरील झालीया येथील विना अनुदानित महाविद्यालयात होते. हे परीक्षा केंद्र फक्त एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे भर उन्हातही परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी व वेळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होते.
advertisement
नुकतीच 15 मे पासून पदवीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना किंवा कावराबांध येथील महाविद्यालयाला कुठली पूर्वसूचना न देता परीक्षा केंद्र परीक्षेच्या दोन दिवसापूर्वी मिळालेल्या हॉल तिकीटद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र एम बी पटेल महाविद्यालयात असल्याचे कळले. विद्यापीठाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना धक्काच बसला. काही विद्यार्थ्यांच्या घरापासून हे परीक्षा केंद्र 25 ते 30 किलोमीटर लांब आहे. या मार्गावर वेळेवर बसची सोय नाही. या नक्षल प्रभावित भागातून सायंकाळी परत येण्यासाठी बसची संख्या फारच कमी असल्यामुळे पालकांना मुली घरी परत येण्यापर्यंत काळजी असते. महाविद्यालयाने सुद्धा विद्यार्थ्यांची हित लक्षात घेता नागपूर विद्यापीठ परीक्षा विभागाला पत्राद्वारे परीक्षा केंद्र बदलून मिळण्यासाठी विनंती केली. परंतु, विद्यापीठाने या समस्याकडे लक्ष दिले नाही.
वाचा - गडचिरोलीत अशोक नेते हॅटट्रिक मारणार की काँग्रेसचा नवा डाव चालणार? काय सांगते आकडेवारी?
विद्यापीठाचा हा निर्णय फारच अफलातून वाटत असून हे विद्यापीठाने हेतू पुरस्कर केले असावे अशी शंका व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे काही विद्यार्थिनी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठाने हा निर्णय रद्द करून ते पूर्ववत करावे किंवा जीके महाविद्यालयात नवीन परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
