भारतीय संस्कृतीत उजव्या हाताने दिलेली मदत डाव्या हाताला कळू द्यायची नाही अशी परंपरा आहे. मदत द्यायची तर सगळे पीक गेलंय त्याची भरपाई द्या, मग तुमचा भला मोठा फोटो लावा, मग आम्हाला हरकत नाही. देताय काडीची मदत आणि गाजवाजा करताय. माझं शेतकऱ्यांना एवढंच सांगणे आहे की, अशा चमकोगिरी करणाऱ्यांना शेतकऱ्यांनो चिखलात लोळवा, असे म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारच्या मदतीवर निशाणा साधला आहे.
advertisement
देताय काडीची मदत आणि गाजवाजा करताय? राजू शेट्टींचा सवाल
राजू शेट्टी म्हणाले, संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. जणू काय जलप्रलय आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे असतील तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची सर्व कर्ज महायुती सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे माफ करायला पाहिदे, ते राहिलं बाजूला... स्वत: मुख्यमंत्री सांगत आहे की सरासरीच्या 110 टक्के पाऊस पडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करायला यापेक्षा दुसरा मोठा काय पुरावा पाहिजे. 10 मे पासून पाऊस पडतोय.
शेतकऱ्यांची जी चेष्ठा लावली आहे ती अतिशय संतापजनक : राजू शेट्टी
शेतकऱ्याला जी तुटपुंजी मदत दिली जाते त्यावर नेत्यांचे फोटो, पक्षाचा लोगो, पक्षाचे नाव हे काय चाललंय? शेतकरी काय भिकारी आहे का त्याची चेष्ठा चालवली आहे. देऊन देऊन देताय काय अतिशय तुटपुंजी मदत ही पाण्यात बुडणाऱ्या माणसाला दिली आहे. तुमचे धंदे सगळे आम्हाला माहिती आहे, कुठून पैसा कमावला माहीत आहे. शेतकऱ्यांची जी चेष्ठा लावली आहे ती अतिशय संतापजनक आहे , असेही राजू शेट्टी म्हणाले.
हे ही वाचा :