नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरसूल आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जमिनीच्या पोटातून गूढ आवाज येत असून त्यानंतर सौम्य धक्के जाणवत आहेत. हे धक्के जरी सौम्य असले तरी, हे 24 तासांत चार वेळा घडल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. सुदैवाने, या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा घरांचे मोठे नुकसान झालं नाही. भूकंपाच्या या धक्क्यांची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे.
advertisement
भूकंपाची तीव्रता किती?
हे धक्के नेमके किती रिश्टर स्केलचे होते, याची अधिकृत माहिती भूकंप मापन केंद्राकडून घेतली जात आहे. भूकंप तज्ज्ञांच्या मते, भूगर्भातील खडकांमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे किंवा 'टेक्टोनिक प्लेट्स'मधील घर्षणामुळे असे सौम्य धक्के बसू शकतात. हरसूल परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अनुभव आले आहेत, मात्र एकाच दिवसात चार वेळा धक्के बसणे हा चर्चेचा आणि तपासाचा विषय ठरला आहे.
