३०० गाड्यांचा ताफा आणि मोठे शक्तीप्रदर्शन
आतिष दांडेगावकर यांनी आज हिंगोलीत मोठे शक्तीप्रदर्शन केले. सुमारे ३०० हून अधिक गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. एका बड्या नेत्याच्या पुत्राने अशा प्रकारे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय फटका मानला जात आहे.
advertisement
"वडिलांचे आशीर्वाद घेऊनच निर्णय"
यावेळी माध्यमांशी बोलताना आतिष दांडेगावकर म्हणाले की, "मी हा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही. सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली असून, वडिलांचे (जयप्रकाश दांडेगावकर) आशीर्वाद घेऊनच मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे." त्यांच्या या विधानामुळे जयप्रकाश दांडेगावकर यांची नेमकी भूमिका काय असणार, याबाबत राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हिंगोलीच्या समीकरणांवर काय परिणाम?
आतिष दांडेगावकर हे हिंगोलीतील तरुण आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपला गड राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
