TRENDING:

ट्रोल झाली तरी चालेल पण आज बोलणारच... ठाकरेंच्या अखेरच्या भाषणावर नीलम गोऱ्हे तुटून पडल्या

Last Updated:

उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतील अखेरचे भाषण शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना खटकले असून मी लोकांच्या निशाण्यावर आले तरीही चालेल पण मी आज ठाकरेंना उत्तर देणारच, असे म्हणत त्या कधीकाळच्या पक्षप्रमुखांवर तुटून पडल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रणाली कापसे, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ आज संपुष्टात आला. यावेळी विधान परिषदेत केलेल्या अखेरच्या भाषणात त्यांनी ज्येष्ठ कवींच्या कवितांमधून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ज्यांना मी मोठे केले, त्यांना सर्व काही दिले ती माणसे मला सोडून गेली, अशी खंत व्यक्त करताना कवी सुरेश भट यांच्या मित्र कोण-शत्रू कोण मला कळेलच नाही आणि कवी विंदा करंदीकरांचीच 'केले कुणास्तव ते किती, ते मोजू नये- होणार त्याची विस्मृती- त्याला तयारी पाहिजे' या कवितेचा आधार घेऊन त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. संपूर्ण भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे दोन तीन वेळा निशाणे साधला. त्यांचे हेच भाषण शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना खटकले असून मी लोकांच्या निशाण्यावर आले तरीही चालेल पण मी आज ठाकरेंना उत्तर देणारच असे म्हणत त्या कधीकाळच्या पक्षप्रमुखांवर तुटून पडल्या.
एकनाथ शिंदे-नीलम गोऱ्हे-उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे-नीलम गोऱ्हे-उद्धव ठाकरे
advertisement

नीलम गोऱ्हे ठाकरेंना काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी अनेक कविता वाचून दाखवल्या. ती कविता ही त्यांच्या बाबतीतच होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्हाला बरे वाटलं. पण शेवटच्या १ वर्षात आमचा भ्रमनिरास झाला. हे वर्ष वर्ष कुणाला भेटत नव्हते. तिथ गेले की लक्षात यायचे की त्यांना आम्ही नको आहोत. काही झाले की सोडून गेले... सोडून गेले... पण का सोडून गेले त्याचा विचार करा ना... असा पलटवार नीलम गोऱ्हे यांनी केला.

advertisement

आम्हाला तर भेटत नव्हतेच पण उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना देखील भेटत नव्हते. मिलिंद तर आमच्या सारख्या कोरोना टेस्ट करायचा. कोविडमध्ये काम केले असे ते म्हणतात. अहो पण शिंदेसाहेब देखील काम करत होते. त्यांनी पिपीई किट घालून काम केले ना.... ते म्हणाले रेडा कापला.. अहो तुम्ही श्रद्धेच्या नावाने काय काय करत होतात, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असा बोचरापलटवारही गोऱ्हे यांनी केला.

advertisement

प्रत्येकवेळा कही पे निगाहें- कहीं पे निशाणा... सारखं सारखं कशाला? मला माहिती आहे माझ्या या बोलण्याने मी लोकांच्या निशाण्यावर येईल. माझे खूप ट्रोलिंग होईल, मात्र बोलणं गरजेचं आहे, असे गोऱ्हे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या कवितांवर पलटवार करताना नीलम गोऱ्हे यांनी कोणत्या गाण्याचा आधार घेतला?

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा

advertisement

मी पणाचा दिमाख तुटला

अंतरंगी आवाज उठला

ऐरणीचा सवाल सुटला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

या कहाणीचा...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ट्रोल झाली तरी चालेल पण आज बोलणारच... ठाकरेंच्या अखेरच्या भाषणावर नीलम गोऱ्हे तुटून पडल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल