डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मन सुन्न झालं हात पाय थरथरायला लागले. कारण आता सोहेल परत कधीच घरी येऊ शकणार नव्हता. उरूस साजरा करण्यासाठी जी वाट पाहात होते तो आता साजरा होणार नव्हता. सोहेलचा मृतदेह घरी आला होता.
निलंगा तालुक्यातील कवठी पाटी ते तुपडी मार्गावर रविवार दुपारी काळानं घाला घातला. दोन तरुणांचा जागीच मृत्यू झााला. दुचाकीची समोरसमोर धडक झाली आणि त्यातून सोहेल शेख आणि अमर सुनील देशमुख या दोन तरुणांचा मृत्यू झाला. उरूस साजरा करण्यासाठी निघालेल्या सोहेलवर काळानं झडप घातली. या प्रवासाचा शेवट इतका भीषण असेल याची कल्पनाही कुणी नव्हती केली.
advertisement
उसने पैसे देताना दहावेळा विचार करा! पुण्यात पैसे परत मागताच समोरच्याची सटकली, पिस्तूल काढला अन्...
सोहेल हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. तो ऑनलाइन सेंटर चालवून आपलं घर सांभाळत होता. उरुसासाठी आई आणि बहीण आधीच आजोळी पोहोचल्या होत्या, सोहेल काम असल्यामुळे त्यांच्यासोबत जाऊ शकला नाही तो मागून येणार होता. मात्र त्याची वाट पाहून आईचे डोळे थकले तो काही आला नाही. त्याचा मृतदेह समोर आल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.
उरुसासाठी सोहल मोठ्या उत्साहाने निघाला. समोरून येणाऱ्या बाईकसोबत त्याची धडक झाली. अपघात भीषण होता त्यामुळे मार लागला होता. गाड्यांचंही नुकसान झाला.
दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गौर गावच्या अमर देशमुखाचं कुटुंब हे शेतीवर उदरनिर्वाह करून राहात आहे. तुपडी इथे घरी परत जात असताना भीषण अपघात झाला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं खरं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही कुटुंबाचा आधार हरपला आहे. सुसाट वेळामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
