TRENDING:

स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रकाशाचा दीप! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रकाशन विभाग आजही तेजोमय!

Last Updated:

देशात स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना अभिव्यक्तीवर बंधने होती. अशा स्वातंत्र्यपूर्व काळातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरूकुंज मोझरी येथे ‘प्रकाशन विभाग’ स्थापन करून एक क्रांतिकारी पाऊल उचलले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
देशात स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना अभिव्यक्तीवर बंधने होती. अशा स्वातंत्र्यपूर्व काळातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरूकुंज मोझरी येथे ‘प्रकाशन विभाग’ स्थापन करून एक क्रांतिकारी पाऊल उचलले. त्या काळात ग्रामीण भागात सामाजिक जागृतीसाठी छापील शब्द हे प्रभावी साधन ठरावे, या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. या प्रकाशन विभागातून तुकडोजी महाराजांनी स्वतःच्या लेखणीद्वारे अनेक साहित्य प्रकाशित केले. हा स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रकाशन विभाग अजूनही गुरूकुंज मोझरी येथे सुरू आहे. याबाबत माहिती अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ प्रकाशन विभाग प्रमुख गोपाल कडू यांनी दिली आहे.
advertisement

स्वातंत्र्यपूर्व काळात प्रकाशन विभाग स्थापन

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ प्रकाशन विभाग प्रमुख गोपाल कडू यांनी लोकल18 शी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्री गुरुदेव प्रकाशन मंडळची स्थापना सन 1935 साली गुरूकुंज मोझरी येथे केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं समग्र वांग्मय या प्रकाशन विभागाच्या माध्यमातून प्रकाशित केलं जातं होत. या प्रकाशन विभागाची स्थापना महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केली. तेव्हा या विभागाचे नाव धर्मसेवा प्रकाशन विभाग असं होतं. त्यानंतर या विभागाचे नाव श्री गुरुदेव प्रकाशन विभाग असं करण्यात आलं. या प्रकाशन मंडळाची स्थापना करण्यामागचा उद्देश म्हणजे समाजजागृतीसाठी विचारप्रसार करणे. संत साहित्य, भजन, कीर्तन, प्रवचन आणि समाजसुधारणेचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. तसेच राष्ट्रसंतांच्या ग्रंथांचे आणि सामाजिक वाङ्मयाचे प्रकाशन करणे हा होता.

advertisement

कारागृहात ग्रंथ निर्मिती

स्वातंत्र्यपूर्व काळात देखील महाराजांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यामध्ये सर्वात आधी 1929 साली हिंदी भजनावली प्रकाशित झाली. त्यानंतर 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये महाराजांनी मोलाचे योगदान दिले. अमरावती जिल्ह्यातील शहीद भूमीमध्ये जाऊन तेथील युवावर्गामध्ये  स्वातंत्र्याबद्दल जागरूकता निर्माण केली. अशातच 28 ऑगस्ट 1942 रोजी महाराजांना चंद्रपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना रायपूर येथील कारागृहातमध्ये ठेवण्यात आले. त्या कारागृहातील वर्तमानपत्राच्या वरच्या कोऱ्या भागावर महाराजांनी सुविचार लिहिले. त्याच सुविचारतून त्यानंतर काही दिवसांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ प्रकाशित झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
सर्व पहा

तसेच ग्रामगीता हा ग्रंथ लेखनाची स्फूर्ती 1953 साली महाराजांना पंढरपूर क्षेत्रामध्ये झाली. त्यानंतर प्रत्यक्ष लेखनाला गुरुकुंज भुमिमध्ये 17 ऑक्टोबर 1954 ला सुरुवात केली. तसेच 25 डिसेंबर 1955 रोजी ग्रामगीता ग्रंथ लिहून पूर्ण झाला. तुमसर येथील विदर्भ साहित्य संघाच्या अधिवेशनामध्ये त्याच प्रकाशन झालं. एकावेळी एक हजार ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. विपुल अशी ग्रंथ संपदा महाराजांनी निर्माण केली, अशी माहिती गोपाल कडू यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रकाशाचा दीप! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रकाशन विभाग आजही तेजोमय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल