या उपक्रमामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतीलच, शिवाय भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून स्थापित केले जाईल. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की आज सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर डेटा अॅनालिटिक्स, ग्राफिक डिझाइन आणि डिजिटल मार्केटिंगसह विविध क्षेत्रांचा समावेश असलेला एक उदयोन्मुख उद्योग आहे.
Budget 2026: महात्मा गांधी स्वयंरोजगार योजनेची घोषणा, या योजनेचा कोणाला होणार फायदा?
advertisement
शाळांसोबत 500 कॉलेजमध्येही होईल ट्रेनिंग
या योजनेचा विस्तार फक्त शाळांपर्यतं मर्यादित नाही. उच्च शिक्षण प्राप्त करत असलेल्या तरुणांना आणि अधिक तांत्रिकरित्या सक्षम बनवण्यासाठी देशातील 500 प्रमुख कॉलेजमध्येही या लॅप्सची निर्मिती केली जाईल.
या लॅब्समधून विद्यार्थ्यांना व्हिडिओ एडिटिंग, पॉडकास्टिंग, स्क्रिप्टरायटिंग आणि सोशल मीडिया मॅनेडमेंटसाठी आवश्यक असलेली आधुनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर उपलब्ध होतील. सरकारचा उद्देश असा एक परिसंस्था तयार करणे आहे जिथे विद्यार्थ्यांना पदवी व्यतिरिक्त डिजिटल जगासाठी आवश्यक असलेली व्यावहारिक कौशल्ये देखील मिळतील.
क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये भाराताची नवी झेप
भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया बाजारामधून एक आहे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि डिजिटल अॅडव्हर्टाजिंगची वाढती मागणी पाहता, सरकारची ही गुंतवणूक दूरदर्शी मानली जात आहे. IICT या लॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फक्त कॉन्टॅंट बनवणे शिकवेल, यासोबतच त्यांना डिजिटल एथिक्स, कॉपीराइट कायदा आणि मोनेटायजेशनचे बारकावेही शिकवेल. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना येत्या काळात घरबसल्या उत्पन्न मिळवण्याचे आणि मोठ्या ब्रँडशी जोडण्याचे मार्ग खुले होतील.
